📰 ताज्या घडामोडी

निस्वार्थ केलेला परमार्थ हाच उच्च कोटीचा आनंद देतो– विलास महाराज गेजगे

Shamsundar chittoda
25 जानेवारी 2026⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

परमार्थ करत असताना आनंद होत असेल तर आपण परमार्थ करत आहोत ही भावना निर्माण आपोआप होते काही जण म्हणतील परमार्थात आनंद कसा तर प्रत्येक मनुष्य परमार्थ करत नाही प्रत्येक मनुष्य माळकरी नाही प्रत्येक मनुष्य गंध टिळा बुक्का लावत नाही .माळ घालण्यासाठी परमार्थ करण्यासाठी प्रवृत्त होण्यासाठी या जन्मात मनुष्याला अनंत जन्माची पुण्याई निश्चित लागते तर त्या मनुष्याकडून निस्वार्थ परमार्थ घडू शकतो व तो परमार्थ करत असताना त्या मनुष्याला उच्च कोटीचा आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही असे प्रतिपादन विलास महाराज गेजगे यांनी तळणी येथे केले यंदाचे या सप्ताहाचे हे विसावे वर्ष असून श्री संत सेवा मंडळ व ग्रामस्थ यांच्याकडून या भव्य दिव्य सप्ताहाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते

जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या आता भय नाही असे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची या अभंगावर महाराजांनी निरूपण केले

परमार्थ हा प्रत्येकाला न घडण्याचे कारण म्हणजे त्याच्या मुळात तील पाप वृत्तीचा दोष परमार्थिक वृत्ती साठी पूर्वीचे संचितही खूप महत्त्वाचे आहे त्याशिवाय या कलियुगात मनुष्याला साधक व परमार्थ कृती सहजासहजी निर्माण होणे या वातावरणात तरी शक्य नाही देवाचा प्रसाद सुद्धा मनुष्याला भाग्यनच मिळतो तो ग्रहण करायचा झाला तरी नशिबात असल्याशिवाय मिळत नाही परमार्थिक साधना करत असताना कुठलाही स्वार्थ मनात ठेवला तर ती साधना देवाला अप्रियच आहे आपल्या साधुसंतांची साधना ही जगाच्या कल्याणासाठी होती म्हणून त्यांचा उद्धार झाला परंतु आपण करत असलेली साधना ही स्वार्थी साधना असून ती भगवंताला प्रिय नाही

आजकाल भक्तीचे थोतांड सुरू आहे स्वतःवर संकट आले की मनुष्य देवाचा धावा करू लागतो परंतु आपल्या साधनेत सातत्य असणे गरजेचे आहे रोज आपल्या नित्यनेमानेत्या भगवंताला आपण स्मरण केले पाहिजे एक एक दिवस आपला काळ जवळ येत आहे याचा विचार मनुष्याने ठेवणे गरजेचे आहे

साधू हा समाजाच्या हितासाठी स्वतःला साधनेच्या जोरावर सिद्ध करतो म्हणून त्याला देवतोप्राप्त होते एका जन्मात शस्त्र पाठ झाले .तर अहंकार आहे एका जन्मात कला चांगली आली तर अभिमान आहेपरंतु श्री संत ज्ञानोबाराय श्री संत तुकोबाराय नाथ महाराज यांनी ही साधना अनेक जन्मी केली परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची स्वार्थी भावना निर्माण झाली नाही कारण त्यांनी स्वतःसाठी न काय करता समाजासाठी केले धर्मासाठी केले म्हणून ते आजपर्यंत अमर झाली आहेत .म्हणून निस्वार्थ केलेली भक्तीची पांडुरंग परमात्म्याला प्रिय असते

अंगात आलेला देव राहत नाही परंतु चित्तात शिरलेला देव निघत नाही तुकोबारायांच्या चित्तात देव शिरला होता म्हणून वैकुंठात घेऊन जाण्यासाठी स्वतः देव आले .कारण तुकोबारायांची साधना उच्च कोटीची होती निस्वार्थ होती एकाग्र होती

आज आपल्या गोठ्यात गायीचे अस्तित्व संपत चालली आहे तिला सगळ्यांनी जपा आई-वडिलांची सेवा करा प्रत्येकाने एक गाय पाळा गायीच्या अस्तित्वामुळेच आज आपले अस्तित्व टिकून आहे परंतु दोन पैशाच्या लोभावर आपण तीची सेवा करत नाही गाईची सेवा ही परमात्म्याची सेवा आहे त्यासाठी तिला सांभाळा हा संदेश महाराजांनी शेवटी दिला

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात