📰 ताज्या घडामोडी

अभेदाची भक्तीच देवाला प्रिय; भेद त्यागून परमार्थ करा – दशरथ अंभोरे महाराजांचा

Shamsundar chittoda
21 जानेवारी 2026⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परमार्थ करायचा असेल तर तो अभेदाच्या भावनेतूनच झाला पाहिजे. भेद धारण करून केलेली भक्ती देवाला प्रिय ठरत नाही. *अभेदाची भक्ती करावी, तीच भक्ती देवाला प्रिय आहे*, असा रोखठोक व विचारप्रवर्तक उपदेश दशरथ महाराज अभोरे यांनी तळणी येथे केला.

हरीच्या भक्त नाही भय चिंता या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण केले परमार्थिक साधना करत असताना अनेक अडचणी येत असतात परंतु मनाभावातून केलेली साधना ही त्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचते फक्त त्या साधनेमध्ये अहंकार गर्व नसला पाहिजे आदर व ही नम्रपने केलेली साधनांचा स्वीकार देऊ नक्की करत असतो

श्री संत सेवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या पाचव्या दिवशी कीर्तनसेवेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा आधार घेत परमार्थाचा खरा अर्थ उलगडून सांगितला.

महाराज म्हणाले की, आज अनेक जण परमार्थ करत असतानाही अंतःकरणात भेद बाळगतात. संसारामध्ये अभेद पाहिला जातो आणि परमार्थामध्ये भेद केला जातो, ही मोठी चूक आहे. *खरं तर संसारात भेद हवा आणि परमार्थात अभेद हवा*, हे जगद्गुरु तुकोबारायांनी ओळखले होते. दुःख भेदातून येते, तर परमार्थातील सुख अभेदातून प्राप्त होते.

परमार्थ हा स्वतःच्या बुद्धीने करण्याचा विषय नसून त्यासाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शास्त्रात सांगितलेला श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ व कृपाळू असा सद्गुरू लाभल्याशिवाय परमार्थ साध्य होत नाही. हे तिन्ही गुण जगद्गुरु तुकोबारायांमध्ये होते, असेही त्यांनी सांगितले.

जगद्गुरु तुकोबारायांनी आपली परमार्थिक सत्ता सोडून व्यावहारिक जगात अवतार घेतला. त्यांचे बालपण, संसारातील जबाबदाऱ्या, दुःख, संकटे ही सर्वसामान्य माणसासारखीच होती. संसारात दुःखाव्यतिरिक्त काहीच नाही, हे ओळखून त्यांनी परमात्म्याचे भजन केले आणि प्रत्यक्ष विठ्ठलाचे साक्षात्कार घेतले, असे महाराजांनी सांगितले.

भक्तिमार्गालाच मनुष्याच्या आयुष्यात सर्वोच्च स्थान असले पाहिजे. मात्र आजची भक्ती स्वार्थी झाली असून संकट आले कीच देव आठवतो, ही भक्ती भगवंताला प्रिय नाही. सातत्याने, निःस्वार्थ भावनेने केलेली भक्तीच मोक्षाकडे नेते, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

तरुण पिढी व्यसनाच्या वाटेवर; संस्कारांची गरज

आजच्या तरुण पिढीत व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढत असून व्यसनांना फॅशन समजले जात आहे. त्यामुळे तरुण स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहेत. मुलांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे. तरुणांनी धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, महाराणा प्रताप यांसारख्या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन मार्गक्रमित करावे, असे आवाहनही दशरथ महाराजांनी यावेळी केले.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात