📰 ताज्या घडामोडी

धर्माच्या रक्षणासाठी जातीभेद विसरून एकत्र येण्याची गरज,मराठवाड्यातून विदर्भापर्यंत धर्म संस्कृती व राष्ट्रचैतनेचा ऐतिहासिक व पवित्र संकल्प

Shamsundar chittoda
14 जुलै 2025⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

सद्यस्थितीत आपला सनातन हिंदू धर्म हा अनेक संकटांना सामोरे जात आहे यामध्ये धर्मांतर हा विषय प्रामुख्याने आहे लव्ह जीहाद यासारख्या घटना आपल्याला आव्हान देत आहेत पश्चिम बंगालमधील हिंदू वर होत असलेल्या अत्याचारा असो की जळत असलेले मणिपूर याला कारण फक्त विखुरलेला आहे मी समाज आपण बहुसंख्यांक असून सुद्धा आपल्यावरच याचे आघात होत आहेत भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्याला एक संघ राहावे लागेल जातीभेदाच्या भिंती तोडून आपण सर्व हिंदू आहोत प्रत्येक हिंदू हा माझा बंद आहे हा भाव जोपर्यंत आपल्या मनात निर्माण होत नाही तोपर्यंत आपण सुरक्षित नाहीतआपली एकीचीवज्रमूठ समोरच्याला जागेवर बसू शकतेअखंड भारताचा इतिहास आपण जर बघितला तर आपण अधिक प्रमाणात गमावून बसलेला भाग आहे इराण आपले होते आपण बांगलादेश गमावून बसलो आपण पाकिस्तान गमावून बसलो नेपाळची पण फारशी परिस्थिती चांगली नाही जगाच्या पाठीवर एकमेव असलेले हिंदू राष्ट्र टिकवायचे असेल तर जातीभेदाच्या भिंती तोडून आपल्याला एक संघ राहाव लागेल असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कथावाचक विवेक दास शास्त्री महाराज यांनी आज तळणी येथे केले

यावेळी बोलताना त्यांनी या यात्रेचा उद्देश उपस्थित त्यांना सांगितला ही यात्रा सांस्कृतिक अस्तित्व व हिंदू समाजाला जागृत करण्यासाठीच काढली आहे ही यात्रा धर्मनिष्ठा संघटनव आत्मगौरव पुन्हा जागविणारा जनजागरणाचा महाअभियान ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

ही यात्रा कोण्या धर्माच्या विरुद्ध नाही ही यात्रा फक्त आणि फक्त हिंदुत्वासाठी आहे गायीच्या संरक्षणासाठी आहे आज हजारो गाईंची कत्तल होत असताना सुद्धा झोपलेला हिंदू समाज याकडे कधी डोळे उघडून बघणार छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा धर्माच्या रक्षणासाठी कार्य केले धर्मवीर संभाजी महाराजांनी सुद्धा आपले बलिदान धर्मासाठी दिले आपण त्यांचा आदर्श घेणार तरी कधी त्यांच्या त्यागामुळेच आपण आज सुरक्षित आहोत परंतु त्यांनी केलेले कार्य मात्र आपण विसरत चाललो आहोत

या यात्रेचा हेतू केवळ धार्मिक नसूनराष्ट्रीय सांस्कृतिक पुनर्जागरणाचा ही आहे हिंदू राष्ट्राची संकल्पना श्रीकृष्ण जन्मभूमीमुक्ती आंदोलनकाशी विश्वनाथ ज्ञान वापी यासारख्या पवित्रअस्मितेचे रक्षण करण्यासाठी या यात्रेची संकल्पना आहे

भारत मातेच्या सरक्षणासाठी अनेकांनी आपले बलीदान या मातृभूमी साठी दिले आहे सध्याचा तरुण हा बेभान होवून जात आहे त्यांना संस्काराची गरज आहे . भारताची अस्मीता असलेल्या राममंदीराला सुद्धा पाचशे वर्ष संघर्ष करावा लागला . हिंदू धर्मावर अनेक आघात होत गेले पंरतू आताची परिस्थिती वेगळी आहे हिंदु समाजाला पोखरण्याचे काम सुरू आहे यासाठी आपण प्रत्येकाने सावध राहावे लागणार आहे तरच आपले अस्तित्व टिकून राहील आपली संस्कृती टिकली तरच आपला देश टिकेलयासाठी आपली एकीची वज्रमुठ असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ह भ प गजानन महाराज सपकाळ यांनी यावेळी व्यक्त केले व्यासपीठावर अनेक महाराज मंडळींची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी यात्रेचे स्वागत दत्त मंदिर संस्थान पासून ते तळणी बस स्टॅन्ड पर्यंत ठिकठिकाणी करण्यात आलेरांगोळ्या व फटाक्याच्या आतिषबाजी यावेळी करण्यात आली महाप्रसाद घेतल्यानंतर यात्रा विदर्भाकडे प्रस्थान केली

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात