📰 ताज्या घडामोडी

मनुष्याच्या आयुष्यात धर्म महत्वाचा तो जपणे गरजे,श्री गीता रामायण सत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प .पू . आनंद चैतन्य बापू यांचे बेलोरा येथे प्रतिपादन

Shamsundar chittoda
3 एप्रिल 2025⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

श्रद्धे शिवाय धर्म असू शकत नाही . धर्म हा आमचा प्राण आहे तो प्रत्येकानी जपलाच पाहिजे . धर्मा रक्षिती रक्षीताः धर्माच्या रक्षणाचे कर्तव्य हे प्रत्येकाने केले पाहिजे ते पण श्रद्धा ठेवून . धर्माची उत्पती ही श्रद्धे शिवाय होऊ शकत नाही श्रद्धा ही फक्त आहे म्हणून कसे जमेल आपल्याला तीचे प्राकटय करण विश्वासाने करावेच लागेल म्हणून श्रद्धा ही महत्वाची आहे . संसारिक मनुष्य खूप मेहनत करतो त्या मेहनतीतील थोडी जरी मेहनत आपण श्रद्धेने भगवत भक्ती साठी केली तर त्या भंगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन बेलोरा येथे चालू असलेल्या श्री गीता रामायण सत्संगाच्या दुसर्या दिवशी प्रतिपादीत केले श्रद्धा वीन धरम नही होई या रामायणातील चौपाई वर निरूपण केले

संसारिक मनुष्याने भगवत भक्ती ही श्रद्धेने केली पाहिजे विश्वासाने केली पाहिजे . जसे की द्रोपदीने विश्वासाने संकटाच्या वेळी भगवंताला शरण जाऊन त्या भगवंताचे स्मरण केले व देव धावून आला . किती श्रद्धा किती विश्वास भगवंता प्रती असला म्हणजे तो आपल्या साठी धावून येईल . त्यासाठी स्वच्छ आणि निस्वार्थ भाव असला म्हणजे तो नक्कीच आपल्या संकट वेळी तो येईलच आपण धर्मासोबतच चालले पाहीजे धर्म आपल्या सोबत येईल शबरी ने आपल्या श्रद्धेवर विश्वास ठेवून भक्ती केली तिने तिचा धर्म जपला म्हणून देव स्वःत तीला भेटायला गेले म्हणून शबरीचा अधिकार सुद्धा मोठा आहे कारण तीची श्रद्धा . जो आपल्या राष्ट्रावर प्रेम करू शकत नाही तो धर्मावर सुद्धा प्रेम करू शकत नाही .

संतांच्या साधनेत सुद्धा त्याची श्रद्धा असते म्हणून तर त्याच्या हाकेवर हजारो लाखो भक्त एकञ येतात कारण त्यांच्या शब्दात असलेले सामर्थ हे त्याच्या साधनेचे फळ असते

मनुष्याने एकमेकावर प्रेम करणे गरजेचे आहे त्या प्रेमातूनच आपली एकी व्यक्त होत असते परतु मनुष्य आज काल स्वार्थी झाला आहे . एकीच्या बळाने संकटाचे निवारण करण्यासाठी धर्माच्या कामासाठी नक्कीच कामी येईल मनुष्याच्या जीवनात आचरण व संस्कार महत्वाचे आहे आपल्या आई वडिलांना जर आपल्या मुळे खाली पाहावे लागेल तर आपले जीवन काहीच कामाचे नाही . आपल्या जीवनात आई वडीलांचा संघर्ष मोठा आहे यांचे भान तरुणांनी ठेवणे गरजेचे आहे

आज कालचा तरुण व्यसनाला फॅशन समजत आहे खरे तर व्यसनाधीनता ही अनेक पिढ्यांना संपवतेय आपण व्यसनाच्या मस्तीत जर गुरफटलो तर आपण आपल्याला संपवतोय व्यसनामुळे . घराचे वैभव धनसंपती . स्वःतची अब्रू . व सामाजीक प्रतिष्ठा तो गमावून बसतो म्हणून व्यसनापासून दूर राहणे हे गरजेच आहे व्यसनाच्या आधीनते मुळे मनुष्याची आयुष्य मर्यादा सुद्धा कमी झाली आहे यावर आपण सतर्क राहावे असने गरजेचे आहे

मनुष्याच्या आयुष्यातील संगत ही खुप महत्वाची आहे चुकीच्या लोकांसोबत आपली संगत आहे कां हे आपण ओळखले पाहिजे आपल्या संगतीत हे मोठी व चांगली माणसे असली पाहिजे यावरून आपली प्रतीष्ठा वाढेल संगत आपल्या जीवनाचा आधार असते त्यामुळे चुकीच्या व्यक्ती सोबत संगत नको

गुडी पाडवा व नुतन वर्षाच्या निमित्य जंगदबा देवी व संत सेवालाल महाराज याच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे . चैतन्य साधक समिती बेलोरा याच्या वतीने श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात