📰 ताज्या घडामोडी

थोर भक्ती चे लक्षण असे आहे की जी मनुष्याच्या मनावर राज्य करते -साध्वी मुक्ताईनाथ माऊली

Shamsundar chittoda
22 मार्च 2025⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणी येथून जवळच असलेल्या कोकरबां येथे चालू असलेल्या अंखड हरीनाम सप्ताहच्या सहाव्या दिवशीची किर्तन सेवा साध्वी मुक्ताईनाथ माऊली यांची किर्तन सेवा सपञ् झाली जगदगूरु तुकाराम महाराज यांच्या हेचि थोर भक्ती आवडते देवा

सकल्यावी माया संसारची ठेविले अनंते तैसीचे रहावे चिती असो द्यावे समाधान या अभंगावरील भावार्थ विषद केला भक्तानी कुठली भक्ती करावी म्हणजे ती देवाला आवडेल . संतानी केलेली भक्ती पंरपरेनी आलेली आहे . भक्तीचा संवांद खूप सुंदर आहे संतांनी जर आपल्याला भक्तीचे महत्व सांगितले नसं ते तर मनुष्य हा दगडाच्या योग्यतेचा झाला असता .गरगाचार्यांनी भक्ती ची सांगीतलेली व्याख्या नारदाना रुचली नाही नारदानी सांगीतलेली भक्ती की देवाचे राञदिवस नामचितंण करणे आवश्यक आहे आणि जर आपण चिंतन जर विसरलो तर आपण त्या भंगवताच्या नावाने रडणे नारदानी विषंद केलेली भक्ती गोपीकेनी सुद्धा केली म्हणून भगवंताचा सहवास गोपीकेला लाभला तुम्ही आम्ही सुद्धा अशीच भक्ती करा जेणे करून भंगवंत आपल्याजवळच राहीला पाहिजे

तुकोबारायांना सुद्धा थोर भक्ती या अभगातून विषद केली त्या थोर भक्ती चे लक्षण असे आहे की जी मनुष्याच्या मनावर राज्य करते . आपण केलेल्या भक्ती मधून ज्ञान वैराग्य आपल्याला मिळने गरजेचे आहे संसारा वरील आपली आसक्ती कमी झाली हे जर आपल्याला कळाले तर आपली भक्ती योग्य मार्गाने चालू आहे असे आपण समाजावे . संसाराचा विकल्पच निर्माण होऊ नये म्हणजे सकल्प करायचे कामच राहणार नाही . सकल्प असावा तो भक्तीचा असावा व तो सकल्प पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न जर मनुष्याने केला तर त्याचा आत्मोध्दार झाल्या शिवाय राहणार नाही . यासाठी देवाने आपल्याला जसे ठेवले आहे तसेच राहून त्याला आळवावे . ससारातील माया संपली पाहिजे यासाठी आपल्याला त्याची एकाग्र चित्ताने त्याचे स्मरण करणे गरजेचे आहे

जीवनामध्ये माणसाने न्यूट्रल असले पाहिजे . आपण पावित्र्य जपून आपली भक्ती करावी . आपल्या संसारात समाधानी राहून त्याची मनोभावे भक्ती केली तर तो भगवंत आपली इच्छा नक्की पूर्ण करेल गरज आहे आपल्या समाधानी राहण्याची हाव आपल्याला धनाची नसली पाहिजे . आपल्याला हाव भगवत भक्तीची परिपूर्ण ओढ असणे गरजेचे आहे . तरच ती भगवत देवाला प्रिय असते . संसारिक मनुष्याकडे भगवत भक्ती साठी वेळ असून सुद्धा तो त्या भगवत भक्ती कडे प्रवृत होत नाही उलट तो धनसंचय करण्यासाठी अधिक वेळ देत आहे धनसंचय हा नाशवत आहे आहे कारण तो धनसंचय भक्ती मार्गाला अडथळा आहे आपल्या प्रारब्धात जेवढे आहे ते मिळणारच आहे ते कोणही हिरावून घेणार नाही . आपल्या सचितात जे आहे ते भगवंतच आपल्याला देतो .आपले प्रेम हे भगवंतावर असले पाहिजे आपले प्रेम धर्मावर असले पाहीजे प्रेम संतावर असले पाहिजे आई वडीलवर आपले प्रेम असणे जास्त गरजेचे आहे

मनुष्याला मिळणारे भौतीक सुख हे क्षणीक आहे त्या संसारिक सुखाच्या मागे धावून उपयोग नाही मृगजाळाचे पाणी पिऊन कोणाचीही थहान भागणार नाही विषयात सुख आहे म्हणजे ते मुर्खता आहे सुख कोठे असेल तर नामस्मरणात भगवत भक्ती आहे ती स्वीकारली तर मनुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही . आपले कर्मच आपले भोग ठरवत असते म्हणून आपले कर्म ठरवून केले पाहिजे चांगले कर्म करणारा मनुष्य म्हणजे साधकच समजावा असे साध्वी महाराजांनी आपल्या निरुपणात या किर्तनासाठी पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थाची उपस्थिती होती

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात