📰 ताज्या घडामोडी

आयुर्वेद चिकित्सा ही भारताची सर्वात्कृष्ट चिकित्सा . बबनराव लोणीकर

Shamsundar chittoda
8 मार्च 2025⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

मंठा तालुक्यातील तळणी येथे आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉक्टर सौ रुपाली रवींद्र देशमुख यांच्या विश्वरूप आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म सेंटरचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी परतूर मंठा विधानसभा चे आमदार बबनराव लोणीकर महंत बालक गिरी महाराज श्रीकृष्ण चैतन्य स्वामी निळकंठेश्वर व महंत चरणदास महाराज डाँ रविंद्र देशमुख ह भ प विष्णू महाराज बांदाड यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला

यावेळी बोलताना लोणीकर यांनी असे सांगितले की आयुर्वेद चिकित्सा ही भारताची प्राण आहे अनेक साधुसंतांच्या ऋषीमुनींच्या कठीण परिश्रमातून आयुर्वेदाचे नवीन नवीन शोध त्या काळात सुद्धा लावले गेले असल्याने आज त्याच शोधाच्या आधारावर संपूर्ण विश्व हे आयुर्वेदिक चिकित्सालया कडे आशेने बघत आहे भारतातच मोठ्या प्रमाणात या आयुर्वेद चिकित्सा भारतातच होत असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे आयुर्वेदाला जागतिक पटलावर त्याचे महत्त्व वाढण्याचे काम अनादी काळापासून सुरूच आहे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्य स्वतःची दिनचर्या हरवून बसला असून आपली दिनचर्या कशी असावी हे सुद्धा आयुर्वेदाने आपल्याला सांगितले आहे आपल्या पूर्वजांनी सुद्धा आयुर्वेदाचाच वापर करून तंदूरस्त जीवन कसे जगता येईल याचाच विचार केलेला आहे आज-काल आयुर्वेदाला फार प्रसिद्ध जरी नसली तरीसुद्धा येणारा काळा आयुर्वेद चिकित्सला यासाठी सुवर्णकाळ असणार आहेकारण की आयुर्वेदाची औषधी व तिचे उत्पन्न हे संपूर्ण भारतातच मिळत असल्याकारणाने व त्याचे दुष्परिणाम नसल्याकारणाने लोक त्याकडे या पुढील काळात नक्कीच वळतील असा आशावाद त्यांनी या वेळेस व्यक्त केला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून व आयुर्वेद या विषयावर काम करण्याची जिद्द एक ग्रामीण भागातील महिला डॉक्टर करते याबद्दलही लोणीकरांनी डॉक्टर रूपाली देशमुख यांचे कौतुक केले

यावेळी डॉक्टर रूपाली देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आयुर्वेद चिकित्सा व पंचकर्म या पुढील काळात प्रत्येकाने करणे गरजेचे आहे अनेक छोट्या गोष्टी ज्या आहेत आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडित त्याचा विसर पडलेला असला कारणाने आपण आयुर्वेदाकडे वळत नाही परंतु आयुर्वेदिक ही अशी जादू आहे ज्याच्यापासून आपले नुकसान काही नाही परंतु आपला फायदा नक्कीच आहे आपल्या आयुर्वेदात तिळाच्या तेलाला इतकं महत्त्व आहे परंतु आपण बॉडी लोशनचा विचार करतो त्या बॉडी लोशनचे दुष्परिणाम कालांतराने आपल्याला नक्की जाणवतात .पंचकर्मामध्ये वमन विवेचन नस्य रक्त मोक्षन व आजारानुसार वेगवेगळ्या गोष्टी असतात आयुर्वेद आपल्याला आजारी पडू नका असे सांगते परंतु आपल्याला त्यासाठी निसर्गासोबत चालावे लागेल आपण जर निसर्गाच्या विरुद्ध चालू लागलो तर कुठलीच चिकित्सा आपल्याला आजारापासून रोखणार नाही असे प्रतिपादन यावेळेस डॉक्टर रूपाली देशमुख यांनी व्यक्त केले

या कार्यक्रमास सतिश निर्वळ ज्ञानेश्वर सरकटे गजानन देशमुख भाऊसाहेब गोरे दारासिंगं चव्हाण गोपाळराव बोराडे भगवान देशमुख नितीन सरकटे शरद पाटील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात