📰 ताज्या घडामोडी

मा बागेश्वरी च्या दहाव्या गळीत हंगामाचा मोळी टाकून शुभारंभ.

Shamsundar chittoda
7 नोव्हेंबर 2023⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

मा बागेश्वरी साखर कारखान्याच्या दहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज दिनांक ६ रोज सोमवारी कारखान्याचे जनरल मॅनेजर रमेश निर्वळ यांच्या हस्ते मोळी टाकून करण्यात आला. मा बागेश्वरी साखर कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज झाला असून मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

या कारखान्याने गळीत हंगाम २०२२- २३ मध्ये ४ लाख ४१ हजार ३३६.१२७ मे. टन उसाचे गाळप करून साखर पोती उत्पादन ५०२११० क्विंटल होऊन सरासरी साखर उतारा ११.३७ एवढा राहिला याप्रमाणे येणारा निव्वळ एफ आर पी दर रुपये २६७८.४० पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून जाहीर केल्याप्रमाणे कारखान्याने उद्दिष्ट पूर्ण केले. मागील दहा वर्षापासून साखर कारखान्याचे सर्व गळीत हंगाम यशस्वी पणे पूर्ण करून ऊसाला चांगला भाव देण्यात आला आहे. या चालू हंगामात शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन पहिली उचल २२०० रुपये प्रमाणे देण्यात येणार आहे. त्यानंतर बैलपोळा सणासाठी दुसरा हप्ता व दीपावली पूर्वी तिसरा हप्ता निघालेल्या एफ आर पी प्रमाणे दर शेतकऱ्यांना देण्यात येईल मागील गळीत हंगाम २०२२- ३३ पेक्षाही यावर्षीचा गळीत हंगाम २०२३- २४ साठी एफ आर पी दर अंदाजे निश्चितच चांगला राहील. कारखान्याने यावर्षी ५ लाख मे. टन उसाचे गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून या हंगामात फेब्रुवारी पर्यंत नोंदीचा ऊस गाळपास आणला जाईल त्यानंतर कारखाना परिसरातील बिगर नोंदीचा सर्वच ऊस गाळपास आणणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस जाण्याविषयी चिंता करू नये. या गळीत हंगामात जास्तीत जास्त ऊस मा बागेश्वरी साखर कारखान्यास द्यावा असे आव्हान जनरल मॅनेजर रमेश निर्वळ यांनी यावेळी केले. गळीत हंगाम २०२३- २४ चा शुभारंभ सर्वप्रथम बॉयलरचे प्रदीपन सुंदरराव देशमुख यांच्या हस्ते करून, गव्हाण, वजन काट्याची विधिवत पूजा करून कारखान्याचे जनरल मॅनेजर रमेश निर्वळ यांच्या हस्ते मोळी टाकण्यात आली. यावेळी जनरल मॅनेजर बळवंत पाटील, मुख्य शेतकरी पी. टी. खंदारे, संतोष दिंडे, एम नवनळे, मुख्य अभियंता गजानन जाधव, चीफ केमिस्ट बी. बी. जाधव, ज्ञानेश्वर देशमुख, राहुल माने, खाजा पटेल, हनुमंत मुगळे, सुरक्षा अधिकारी दिनकर लीपणे, मनोहर केंद्रे, विठ्ठल बागल सह ऊसउत्पादक शेतकरी उपस्थित होते. चौकट. भविष्यात एकाही शेतकऱ्याचा ऊस गळपविना राहणार नाही- चेअरमन जाधव. यावेळी कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव म्हणाले की भविष्यात एकाही शेतकऱ्याचा ऊस गळापविना राहणार नाही, अत्यंत अडचणीच्या काळातही कारखाना परिसरातील शेतकऱ्यांचे उसाचे टिपरूही कारखान्याने शिल्लक ठेवले नाही. पावसाळा सुरू झाल्यावरही कारखाना चालू ठेवून शेतकऱ्यांच्या उसाचे मागील काळात गाळप केले आहे. त्यामुळे भविष्यातही शेतकऱ्यांनी ऊस जाण्याची चिंता करू नये. पाण्याचे नियोजन करून उसाचे क्षेत्र वाढवावे सर्व उसाच्या नोंदी घेतल्या जातील व उतसही वेळेवर नेला जाईल. शेतकऱ्यांनी मात्र आपल्या कारखान्याचे हित लक्षात घेऊन आपला ऊस बागेश्वरी कारखान्यासच घालावा असेही आवाहन शेवटी चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी केले. फोटो. मा बागेश्वरी साखर कारखान्याचा कवाली टाकून शुभारंभ करताना जनरल मॅनेजर रमेश निर्वळ सुंदरराव देशमुख बळवंत पाटील पिटी खंदारे गजानन जाधव आदी.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात