📰 ताज्या घडामोडी

श्रध्देविना धर्माची व्याखा अधूरी आहे मनुष्याला श्रध्दा असेल तरच तो सत्संगात येईल -आनंद चैतन्य महाराज

Shamsundar chittoda
6 एप्रिल 2023⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

मंठा तालूक्यातील माळेगाव येथे प पू राष्ट्रीय संत लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे शिष्य श्री आंनद चैतन्य महाराज यांच्या तीन दिवशीय गीता रामायण सत्संगा चे आयोजन माधव भाऊ चव्हाण व माळेगाव ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले जागतीक बंजारा दिवस व हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्याने भव्य नियोजन हे ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले महाराष्ट्रातील चैतन्य साधक परिवाराची मोठी उपस्थीती या सत्संगाला होती प्रारंभी आज भव्य शोभायात्रा काढण्यात आल्याने वातावरणात प्रसन्नता आली

श्रध्देविना धर्माची व्याखा अधूरी आहे मनुष्याला श्रध्दा असेल तरच तो सत्संगात येईल ना सत्संगाचे ज्याच्याबर संस्कार झाले तो श्रध्दावान होणारच जो श्रध्दावान झाला की धर्माचे पण रक्षण होणारच

मनुष्याने श्रद्धावान असले पाहीजे त्याची साधना असली पाहीजे चौदाशे वर्षाचे आयुष्य असणाऱ्या चांगदेवाकडे अहकांर होता त्याच्या कडे श्रध्दा नसल्याने तो चांगदेव कोराच राहीला या उलट चौदा वर्षाची मुक्ताबाई श्रध्दावान ही होती आणि ज्ञानवान पण होती . तिच्या श्रध्दे पूढे चौदाशे वर्षाच्या चांगदेवाची तपश्चर्या कमी पडली आजच्या युगात मनुष्याला खरी गरज आहे ती सत्संगांची तोच सत्संग मनुष्य जीवनाचा उध्दार केल्याशिवाय राहनार सद्यस्थितीत मनुष्य पैश्यासाठी कुठल्याही स्थरावर जात आहे पैश्याच्या मोहापूढे त्याला देश देव धर्म या गोष्टीचा विसर पडला आहे मनुष्याच्या आयुष्यातील आर्थिक सपंती ही त्याच्या उद्धाराचे साधन बनू शकत नाही मनुष्याला उध्दारच करायचा असेल तर त्याला श्रध्दावान असले तर पाहीजे व त्याने सत्संगाची कास धरणे गरजेचे आहे तरच या कलयुगात त्याचा उध्दार शक्य आहे मनुष्याने हे लक्षात ठेवले पाहीजे त्याची सुरवात ही शून्याने होते आणि शेवट ही शून्याने मिळालेले आयुष्य दोनही शून्याच्या मध्ये जगायचे असते त्या वेळेत त्याने त्याच्या पूण्याचा संचय वाढवणे गरजेचे असते तो सचंय वाढवण्याचे ठिकाण जर कोणते असेल तर तो सत्संग परमेश्वराने दिलेली ती संधी मनुष्याच्या उध्दाराची संधी असते त्या संधीचे सोने करणे हे ज्याच्या त्याच्या हातात आहे

तीन दिवशीय या सत्संगाला मातृशक्तीची मोठी उपस्थीती होती मातृशक्तीबद्दल बोलताना बापूजी नी गौरव दगार काढले आदीशक्तीचे विराट दर्शन या संत्सगात झाले मातृशक्तीमुळेच तुमचे आमचे अस्तीत्व टिकून आहे

मनुष्याच्या जीवनात गरीबी आली तर लाजू नये आणि श्रीमंतीचा उन्माद सुध्दा होता कामा नये मनुष्याने स्वःतच्या मर्यादा ओळखून राहीले पाहीजे तरच त्याची पथ राहत असते ज्याला मर्यादा ओळखून वावरता आले त्याला ज्ञानी समजावे

सांसारिक आयुष्यात प्रकृती संस्कृती आणी विकृती या तीन गोष्टीचा वावर आहे दुसर्या ना देने वाटून खाणे ही आपली संस्कृती आहे दोघांना मिळणे व ते समानतेने वाटून घेणे ही प्रकृती झाली पंरतू आपल्या जवळ असून ते इतराना न देने उलट त्याचा आणखी संचय करणे म्हणजे विकृती आहे ती विकृती मनुष्यासाठी घातक आहे

देवाच्या दुकानात सगळ्याची खाते आहेत त्या खात्यात पाप पूण्याचा सगळा हिशोब त्या खात्यात जमा होत असतो मग त्या खात्यामध्ये पाप टाकायचे की पूण्य हे ज्याच त्याने ठरवावे त्या खात्यावर पुण्याचा संचय वाढवायचा असेल तर सत्संगाची कास धरावीच लागेल तरच त्याचा उध्दार झाल्याशिवाय राहणार नाही

शनिवारी या सत्संगाचा समारोप होणार आहे समारोपासाठी महाराष्ट्र शासनाचे मञी संजय राठोड जालन्याचे .पालकमंञी अतूल सावे याची उपस्थीती राहणार आहे आज माजी आमदार सुरेश कुमार जेथलीया यानी सत्संगाचा लाभ घेतला

या सत्संगाच्या यशस्वीतेसाठी माळेगाव येथील ग्रामस्थ परीश्रम घेत आहे

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात