📰 ताज्या घडामोडी

संतांनी आपल्याला दाखवून दिलेला निस्वार्थ भक्तीचा मार्ग स्वीकारावा लागेल-हभप ज्ञानेश्वर महाराज महाले

Shamsundar chittoda
15 मार्च 2023⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणी प्रतिनीधी रवी पाटील

तळणी येथून जवळच असलेल्या कानडी येथे चालू असलेल्या सप्ताह मध्ये पाचव्या दिवशीची किर्तन सेवा ह भ प शिवचरीञकार ज्ञानेश्वर महाराज महाले याची किर्तन सेवा झाली

जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या संतचरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय या अंभगावर निरुपण केले सद्य स्थितीत मनुष्य करत असलेला परमार्थीक साधना ही तकलादू असून त्या साधनेच्या पाठीमागे स्वार्थाचा गंध दिसून येतो त्या ईश्वराला आपल्याला प्राप्त करायचे असेल तर संतांनी आपल्याला दाखवून दिलेला निस्वार्थ भक्तीचा मार्ग स्वीकारावा लागेल मनुष्याला संताच्या चरणपदाचे जरी वास्तव्य मिळाले तरी सुध्दा त्याला देव भेटल्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही कारण की देवाचे आणि संतांचे अस्तीत्व हे सारखेच असते ते अस्तीत्व जर मनुष्याला प्राप्त करायचे असेल तर संत सहवास फार महत्वाचा आहे आज मनुष्याची वासना ही सांसारीक सुखावर जास्त जात असल्याने परमार्थीक आयुष्याची त्याची गोडी कमी झाली संकटे आल्यावर आपण त्याचा धावा करावा म्हणजे आपला तो स्वार्थ आहे जर त्याला आपल्याला प्राप्त करायचे असेल वासने रुपी स्वार्थाला जाळून टाकावेच लागेल तरच तो परमार्थ आपल्याला प्राप्त होईल

भगवंताचे सेवन दुबळेपणा मानतात. पण त्या सेवनाकरता ज्यांनी विकारांवर ताबा ठेवला ते दुबळे नाहीत. विकार आवरणे हेच शूरत्व आहे. विकारांना बळी पडणे हे दुबळेपण आहे.

आपल्याला विषयाची आस आहे. संतांना भगवंताची आस आहे. म्हणून ते त्याचे दास झाले. पण आपण दास बनून भगवंताची आस उत्पन्न करु. कारण आस लागुन त्याचे दास बनता येणे आपल्याला शक्य नाही.

रामाचा दास म्हणून समर्थ रामदास स्वामी झाले.

आपली बुद्धी विषयी आहे. दर्शनही विषयाच्या आधाराने होते. ती बुद्धी संगतीने शुद्ध होते.

विकारांवर जो मालकी गाजवतो तोच खरा मालक, बाकी सर्व गुलाम असतात. ती मालकी भगवंताचा दास झाले तरच येईल.

"भगवंता तुझ्यामुळे मी आहे" हेच खरे. त्याकरता त्याचे होऊन राहावे व अखंड नामात राहावे.

आज काल सप्ताह मध्ये नियोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांची फळी समोर येत असली तरी सुध्दा सप्ताह मध्ये किर्तनकारांचे किर्तन ठरवण्यासाठी यू ट्यूब व इतर सोशल मिडीयाचा आधार घेऊन ठरवल्या जातो ही शोकांतिका असुन कुठल्या कीर्तनाला जायचे हे ठरवण्यासाठी सुधा सोशल मिडीयाचा वापर केल्या जातो सद्यस्थितीत किर्तनच एक असे व्यासपीठ आहे जेथे संबंध सनातन धर्माचे दर्शन होते सर्व मतभेद बाजूला सारून या भगव्या पताका खाली एकसंघ समाजाचे दर्शन दिसून येते आज काल सनातन धर्मावर अनेक संकटाचे वादळ घोघांवंत आहे हे वादळ परतवून लावाययचे असेल सप्ताहाची मोठी गरज आहे छञपती शिवाजी महाराज यांनी अंठरा पगड समुहातील मावळ्यांची एकजूट निर्माण केली व त्याच्यात विश्वास निर्माण केला व हिदवी स्वरांज्याची स्थापना केली आज त्यानी निर्माण केलेल्या या स्वराज्यावर आपण जगत आहोत त्याना अभिप्रेत कोणते काम करायचे असेल तर आपण सगळे जातीपातीच्या भिंती गाडून फक्त आणि फक्त सनातन हिदूं धर्माचीच कास पकडावी आपल्या एकीची वज्रमूठ ही येणार्या पिढीसाठी एक आदर्श ठरेल

किर्तनकार हा समाजाला योग्य दिशा व मार्गदर्शन करणारा असावा तो करत असलेला किर्तन हे ऐकाव वाटेल अस असावे कीर्तनाची मर्यादा त्याला समजली पाहीजे विनाकारण जीन्स पेंन्ट घालून फिरणारा किर्तनकार समाजाला दिशा दाखवू शकनार नाही त्याला वारकरी सप्रंदायाची नितीमूल्य जोपासता आली पाहीजी अशा कीर्तनकारांना किर्तन सेवेसाठी आग्रह करणे हे समाजाला कळणे गरजेचे आहे

कीर्तनाच्या या धर्म मंडपामध्ये आज सगळ्यात जास्त गरज आहे ती तरुणांची किर्तनच एक असे व्यासपीठ आहे की समाज येथे जमतो सुधा व ऐकतो सुधा ' किर्तन एक सस्कांर असून त्या संस्काराचा प्रभाव प्रत्येकावर होणे ही काळाची गरज आहे कारण येणारा काळ हा आपल्या सर्वाच्या परीक्षेचा काळ असणार , असुन त्या परीक्षेत पास होण्यासाठी आतापासून संघटीत अभ्यासाची गरज असल्याचे महाराजांनी शेवटी सांगीतले

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात