📰 ताज्या घडामोडी

सांगता समारोप प्रसंगी मा.आ.जेथलिया यांना अश्रु अनावर, रामकथेची भक्तीमय वातावरणात सांगता,रामकथा ही परिवर्तनाची कथा ह. भ. प. रामराव महाराज ढोक

Shamsundar chittoda
14 फेब्रुवारी 2023⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

.

रामकथा ही परिवर्तनाची कथा आहे. जो पर्यंत मानवाच्या जीवनात परिर्वतन होत नाही तो पर्यंत माणसाची प्रगती होत नाही जीवनात वावरतांना सर्वांचे हिताचे रक्षण करा असे प्रतिपादन ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांनी केले. मा. आ. सुरेशकुमार जेथलिया व जेथलिया परिवाराच्या वतीने परतूर येथे अयोध्या नगरीत सुरू असलेल्या रामकथेच्या सांगता समारंभी मंगळवारी दि.१४ रोजी ह. भ. प. रामराव महाराज ढोक भाविकांना मार्गदशन करत होते.

कथा सांगता प्रसंगी बोलतांना ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांनी रावण वध व रामराज्यअभिषेक या कथे चे वर्णन केले रावण वध हे द्रुष्टाच्या संहाराचे प्रतीक आहे, वाईटावर चांगल्याचा विजय होण्यासाठी द्रूष्ट प्रवृत्तीचा नाश करावा लागतो. रामाला रावणाशी युद्ध करावे लागले आणि द्रूष्ट प्रवृत्तीचा नाश झाला असे ढोक महाराज म्हणाले.रावण हा अत्यंत वाईट माणूस होता कारण रावणाने माता सीतेचे अपहरण केले होते, मात्र रावण एक शक्तिशाली योद्धा असण्यासोबतच, खूप ज्ञानी आणि विद्वानही होता.मृत्युसमयी रावणाने लक्ष्मणाला तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या ज्यात आयुष्याचे रहस्य लपलेले आहे. रावणाचा वध प्रभू रामाने केला रावण हा महादेवाचा खूप मोठा भक्त होता रावणाच्या मृत्यूच्या वेळी रामाने लक्ष्मणाला सांगितले की रावण हा नीती आणि शक्तीचा महान जाणकार आहे.

तसेच अयोद्देतील राम राज्यभिषेक, प्रसंगावर द्रुष्टांत देऊन वर्णन केले या प्रसंगी कथा सांगतांना ढोक महाराज यांनी लक्ष्मणाला लागलेली शक्ती, अंगद ऋषीने रावणा कडे जाऊन केलेली शिष्टाई, राम रावणाचे युद्ध, रामाचा अयोध्या नगरीत प्रवेश आणि भरत भेट यांचे सुदर वर्णन केले प्रभु दर्शनाची व्याख्या सांगतांना ढोक महाराज म्हणाले की काही लोक नामस्मरणाच्या माध्यमातुन तपस्या करतात त्यांना देवाची अनुभुती होते. काही लोक देवासाठी तर काही लोक संसारासाठी तपस्या करतात भरत हा प्रभु दर्शनासाठी व्याकुळ झाला होता याचा द्रुष्टांत देऊन भक्तजणांना ढोक महाराजांनी मंत्रमुग्ध केले.अनुभवी माणसाचे ऐकले पाहीजे.चुकझाली असेलतर मान्य करा संसारात सुख नांदेल लोकांत बिगडला तरी एकांत शाबूत ठेवा एकांत बिगडला तर समाधान मिळणार नाही आणि समाधान नसेल तर त्याच्या सारखे दु:ख कोनतेच नाही धर्म, संस्कार जपा, अहंकार बाळगु नका,आपल्या जीवनात वेळातवेळ काढून प्रभुरामाचा नामस्मरण करा असा उपदेश ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांनी कथेच्या सांगता समारोप प्रसंगी केला.

यावेळी ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांनी रामकथेच्या उत्कृष्ट आयोजना बद्दल मा. आ. सुरेशकुमार जेथलिया यांना व त्यांच्या परिवारातील सदस्यांना शुभेच्छा दिल्या तमेच मा. आ. जेथलिया यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.कथा सांगता वेळी सौ.शीतल प्रवीणकुमार जेथलिया यांनी मनोगत व्यक्त केले.मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हंटले की,राजकरणा बरोबरच समाजकारणाची जोड,धार्मिकतेचे आधीष्ठान यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळते या वरच अशी कार्य पूर्णात्वास जातता असंख्य माता भगिंनीचे आशीर्वाद आणि सहकारी मित्रमंडळ यांचे सहकार्य या बळावरच आज पर्यंतची वाटचाल सुरू असून प्रचंड जनसमुदाय बघून त्यांचा कंठदाटून आला व अश्रु अनावर झाले त्यांनी या प्रसंगी सर्वांचे आभार व्यक्त केले.

कथेच्या सुरवातीला मा.आ.सुरेशकुमार जेथलिया ,मा.नगरध्यक्षा विमलताई जेथलिया व समस्त जेथलिया परिवाराच्या वतिने आरती करण्यात आली. तर आज सांगतेच्या आरतीच्या वेळी जेथलिया परिवारासह उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव,आशाताई आकात,रामेश्वरजी अट्टल येवला,नंदकिशोरजी अट्टल,बाबासाहेब गाडगे,मंगेश डहाळे,इंद्रजीत घनवट,रानेश्वर अन्न नळगे,रमेशजी झवर,राजेश भूजबळ,बाबुराव हिवाळे,राजेश खांडेलवाल,बद्रीभाऊ खवणे,राजुसेठ पोरवाल,राधेश्यामजी मुंदडा,शामजी सोनी,नितिन शिंदे,राजेश मानियर,पांडुरंग काटकर,कैलास भुतेकर,तुकारामजी रूपणार,गोविंद बागडिया,रामचंद्र काळे,माऊली राजबिंडे,लक्ष्मणबापू पवार,भारत चव्हाण,अविनाश शहाणे,विकास झरेकर,दत्ता पवार,दिलीप चव्हाण पा.गोसावी,आंबादास दुगाणे,मिसाळ सर,शामसुंदर काळे,विष्णुकांत सोनी,जनार्धन काळे खडकी,विष्णु चव्हाण,प्रकाश अंभुरे,लक्ष्मण शिंदे,डॉ.केशरखाने,आकाश आकात,जगदीश शर्मा,वसंत काकडे,बागलानी मॅडम,सतीशजी निर्वाळ,यांच्या सह परिसरातील भाविक भक्तांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. या सात दिवासीय रामाकथेचे सूत्र संचालन राजेशजी मंत्री यांनी केले.तदनंतर महाप्रसादाने श्रीरामकथा ज्ञानयज्ञाचा समारोप झाला.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात