📰 ताज्या घडामोडी

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम करावे- अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर ,आमदार लोणीकरांनी मंत्रीपदाच्या काळात केलेले काम मोठे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Shamsundar chittoda
2 फेब्रुवारी 2023⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

मुख्यमंत्री व राज्यातील सरकारने शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम करावे, या ठिकाणाहून जाताना नागरिकांनी आपल्या चिंता विसरून गाव समृद्धीच्या माध्यमातून स्वतःला सक्षम बनवावे असे आवाहन यावेळी बोलताना अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी केले ते वाटुर फाटा ता परतुर येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या आर्ट ऑफ लिविंग च्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आरोग्य मंत्री तानाजी सावंत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर आमदार संजय शिरसाठ माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर कार्यक्रमाचे संयोजक पुरुषोत्तम वायाळ यांची उपस्थिती होती

पुढे बोलताना आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर म्हणाले की स्वच्छता अभियानाची सुरुवात जालना जिल्ह्यातून झाली होती आणि देशभरामध्ये हे अभियान यशस्वीपणे राबवले गेले होते तशीच आज जलतारा या पाणीदार गाव करण्याच्या मोहिमेचे ही यशस्वी लोन संपूर्ण भारतभरात पसरेल व या जलताराच्या माध्यमातून देशभरातील अनेक गावे पाणीदार होत समृद्ध होतील असा आशावाद यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला

यावेळी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणाले की

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये, तात्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे पाणीपुरवठा विभागाचे मंत्री असताना महाराष्ट्रातील सरकारने इजराइलच्या तंत्रज्ञानावर आधारित मराठवाडा वॉटर ग्रीड ची रचना केली होती या माध्यमातून शेतीला पाणी पिण्याचे पाणी व उद्योगांना पाणी उपलब्ध होणार होते मराठवाड्यातील बारा नद्यांना एकत्रित जोडून या प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर होणार होते मात्र आघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर अतिशय महत्त्वाची महत्त्वकांक्षी योजना आघाडी सरकारने भाषणात गुंडाळी होती असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की आमदार लोणीकर मंत्री असताना राज्य सरकारने राबवलेली जलयुक्त शिवार योजना अतिशय प्रभावीपणे राबवण्याचे काम तात्कालीन मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले, जलतारा माध्यमातून अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर जी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्याच्या या पावन भूमीमध्ये गावांना पाणीदार करण्याची मोहीम आर्ट ऑफ लिविंग ने हाती घेतली असून या उपक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याची यावेळी त्यांनी सांगितले

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की सी एस आर फंडाच्या माध्यमातून मोठे जलक्रांती या राज्यामध्ये उभी राहिली असून राज्य सरकार जलयुक्त शिवार टप्पा दोन च्या माध्यमातून जलक्रांती करण्यासाठी वचनबद्ध असल्याची त्यांनी यावेळी सांगितले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जलसंधारण हे खऱ्या अर्थाने आर्थिक क्रांतीकडे मार्ग असून आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून मंठा तालुक्यातील 50 गावे गेल्या वर्षी पाणीदार करण्यात आम्ही यशस्वी झालो असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले

या कार्यक्रमाला मतदारसंघासह मराठवाड्यातून मोठ्या संख्येने शेतकरी आर्ट ऑफ लिविंग चे स्वयंसेवक उपस्थित होते

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात