📰 ताज्या घडामोडी

मोदी सरकारचा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनता शेतकरी कष्टकरी शेतमजुरांच्या हिताचा-माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

Shamsundar chittoda
1 फेब्रुवारी 2023⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

मोदी सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून हा अर्थसंकल्प शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य मध्यमवर्गीय सर्वच वर्गातील लोकांना लाभदायक असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी या अर्थसंकल्पावर भाष्य करताना म्हटले आहे

पुढे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे की शेतकऱ्यांकडून थेट धान्य खरेदीसाठी केंद्र सरकार सरकारी केंद्राची उभारणी करणारा असून या केंद्रामार्फत शेतकऱ्यांचे धान्य थेट केंद्र सरकार विकत घेणार असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले

शेतकऱ्यांना डिजिटल आणि हायटेक सुविधा पुरवण्यासाठी पी पी पी मॉडेलवर योजनांची सुरुवात केली जाणार असून या संदर्भामध्ये या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली असल्याची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी नमूद केले आहे

पुढे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे की शेती पूरक उद्योग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुग्धविकास मत्स्य व्यवसाय पशुपालन व शेती यासाठी कृषी कर्जासाठी 20 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्याचबरोबरबागायती पिकांच्या रोगमुक्त आणि दर्जेदार लागवड साहित्य उपलब्धतेसाठी 2200 रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हंटले आहे

अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत गरिबांना मोफत अन्नधान्य देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असून 2024 पर्यंत या अन्नधान्याचा मोफत पुरवठा गोरगरिबांना केला जाणार आहे महिला सक्षमीकरणाचा उद्देश लक्षात घेऊन महिलांसाठी खास बचत योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी लोणीकर यांनी सांगितले

देशातील एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यास केंद्र सरकार मदत करणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात केली असून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी हा अर्थसंकल्प वरदायी असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले असून दळणवळण रेल्वे साठी मोठी तरतूद करण्यात आली असून 75 हजार कोटी रुपये रेल्वेसाठी या अर्थसंकल्पातून येत्या आर्थिक वर्षात देण्यात येणार आहेत त्यामुळे भारतीय रेल्वेला खऱ्या अर्थाने सांगली दिवस येणार असल्याचे लोणीकर यांनी म्हटले आहे देशाच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने गती प्रदान करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात