📰 ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, जगभरात छत्रपती शिवरायांसारखा दुसरा राजा होणे नाही - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर ,जितेंद्र आव्हाड यांचे बेताल वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत भूमिका आहे का? - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा अजित पवार यांच्यासह जयंत पाटील यांना सवाल

Shamsundar chittoda
7 फेब्रुवारी 2023⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते शिवरायांच्या व्यतिरिक्त रयतेचे राजे असे इतर कोणत्याही राजाला संबोधल्या गेले नाही असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले असून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे ते वारंवार शिवरायांचा अपमान करणारी वक्तव्य करत असून शिवप्रेमी जनता त्यांना बदडून काढेल अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड वारंवार हेतूपुरस्सर व जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत असून औरंगजेब शाहिस्तेखान किंवा अफजल खान यांचे उदात्तीकरण करण्याचा कायम प्रयत्न करत आहेत, जितेंद्र आव्हाड हा मूर्खपणा वारंवार करत आहेत परंतु शिवरायांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या १०० पिढ्या यामुळे बरबाद होतील अशा शब्दात माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना फटकारले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वारंवार औरंगजेब शाहिस्तेखान अफजलखान यासारख्या स्वराज्य दोन्ही व महाराष्ट्र द्रोही असणाऱ्यांचे उदातीकरण केले जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मते औरंगजेब हा क्रूरकर्मा नसून सूफी संत होता तर अफजल खान हा शिवरायांना मारण्यासाठी आला नव्हता अशा प्रकारची मुक्ताफळे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्यांच्या नेत्यांकडून उधळली जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वारंवार अशा प्रकारची शिवप्रेमींच्या भावना दुखावणारी वक्तव्य केले जात असून या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा औरंगजेब, शाहिस्तेखान, अफजल खान हे अधिक चांगले होते असे दाखवण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका बनत चाललेली आहे की काय अशा प्रकारचा प्रश्न सर्वसामान्य शिवप्रेमींना पडतो आहे असेही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले

जितेंद्र आव्हाड शिवरायांचा अवमान करणारी वक्तव्य वारंवार करत असून स्वराज्यद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही असणाऱ्या औरंगजेब शाहिस्तेखान किंवा अफजलखान सारख्या क्रूरकर्म्यांची उदातीकरण करण्याचा कायम प्रयत्न करत आहेत असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणतीही ठोस भूमिका किंवा जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला जात नाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही याचाच अर्थ जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेली भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत भूमिका आहे का असा सवाल देखील माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना विचारला आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात