📰 ताज्या घडामोडी

चार वर्षापासून रखडलेल्या परतूरच्या सिंचन विहिरीचा प्रश्न मार्गी लागणार- ना.संदिपान भुमरे,पत्रकार रशीद बागवान यांनी मांडली शेतकऱ्यांची कैफियत

Shamsundar chittoda
12 फेब्रुवारी 2023⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांशी योजना असलेल्या अहिल्याबाई होळकर सिंचन विहीर योजनेला जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात गाळबोट लागले असून गेल्या चार वर्षापासून ही योजना तालुक्यात बंद पडली आहे. सन २०१७-१८ मध्ये तालुक्यात प्रमाणापेक्षा जास्त विहिरीचे वाटप झाल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेत गोंधळ करण्यात आला होता. मात्र आता याचा आधार घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यासाठी ही योजना तब्बल चार वर्षापासून बंद केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत.आज राज्याचे रोहयोमंत्री ना.संदिपान भुमरे हे परतुर दौऱ्यावर आले असताना पत्रकार संघाच्यावतीने रशीद बागवान यांच्यासह अनेकांनी तालुक्यातील विहिरींचा विषय मांडला असता ना.भुमरे यांनी त्यासंबंधी जिल्हास्तरीय बैठक घेऊन तात्काळ ही योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले.यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की जिल्ह्यात चालू असलेली अहिल्याबाई होळकर धडक विहीर योजना मात्र परतूर तालुक्यात तब्बल चार वर्षा पासून बंद का असा खडा सवाल रोहीयोमंत्री ना संदिपान भुमरे यांना विचारला असता त्यांनी संबंधित जीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांना या विहिरी तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात येईल तसेच शेतकऱ्यांचे उसासह धान्य घरापर्यंत घेऊन जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. यासाठी माझ्या खात्यामार्फत प्रत्येक गाव तांड्यावर मी पानंद रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे यावेळी सांगितले. हाही प्रश्न लवकरच मार्गी लावण्याची आश्वासन यावेळी ना.भुमरे यांनी दिले. यावेळी त्यांनी.मा आ सुरेशकुमार जेथलिया यांच्या वतीने आयोजित रामकथे ला आज दिनांक 11 रोजी उपस्थिती दर्शवली असता, वरील योजने बाबत शेतकाऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याची कैफियत पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार रशीद बागवान यांनी मांडली सदरील योजने बाबत गेल्या चार वर्षापूर्वी तत्कालीन पंचायत समिती परतूरचे गटविकास अधिकारी यांनी मंजुरी वितरिक्त अतिरिक्त विहिरींना मंजुरी दिली होती, याचा ठपका ठेवत त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते, तेव्हा पासून ही योजना बंद असल्याने याचे लाभधारक शेतकरी हवाल दिल झाले होते, या बाबत जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर यांनी या विहिरी च्या प्रश्नाबाबत शेतकऱ्याना सोबत घेत जिल्हा परिषदेवर प्रचंड मोर्चा काढला होता. मात्र तरीही चार वर्षे उलटून ही योजना बंद असून यामुळे शेतकऱ्यांना याचा कुठलाच लाभ मिळत नसल्याची खंत बागवान यांनी रोहीयोमंत्री ना.भुमरे यांच्या समोर व्यक्त केली असता, तातडीने ना.भुमरे यांनी जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी मीना वर्षा यांना मोबाईलवर संपर्क केला व सदरील योजनेचा पाठपुरावा करत ही चालू करण्याची त्यांनी सूचना केली या मुळे चार वर्षांपासून प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात