📰 ताज्या घडामोडी

आम्हावरी धरीलीया राग काय तुझे सांग केले आम्ही -भ प विष्णू महाराज देशमूख

Shamsundar chittoda
27 जानेवारी 2023⏱️ ४ मिनिटे वाचन
WhatsApp

अध्यात्मामध्ये शंकराने जाळले म्हणजे ज्ञानाने जाळले ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे आणि भगवान श्रीकृष्णाने जाळले म्हणजे विरहाने जाळले काम कधी कधी ज्ञानाने ही नष्ट होत नाही तो भक्तीन पळून जातो असे प्रतिपादन ह भ प विष्णू महाराज देशमूख यानी तळणी येथे काल्याची प्रसंगी केले तळणी येथे चालू असलेल्या अंखड हरिनाम सप्ताहची सांगता काल काल्याने झाली संत नामदेव महाराज यांच्या आम्हावरी धरीलीया राग काय तुझे सांग केले आम्ही या अभंगावर निरूपण केले

भगवान शंकराची समाधी भंग करण्यासाठी रती कामदेव गेले कामदेवाने जेव्हा आपल्या पंच बाणाने समाधी भंग केली महादेवानी तीसरा डोळा उघडून कामदेवाला जाळले एकदा जळाल्यानंतर ही कामदेव सावधान होत नाही मग रास क्रीडेतून श्रीकृष्णाच्या ह्दयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो पण ते कामदेवाला शक्य झाले नाही कारण कृष्ण हा निष्काम निराळा आहे मग कामदेवाने गोपीकेच्या ह्दयात प्रवेश केला कृष्णा ने जेव्हा ही घटना जाणली . कृष्ण जाण्याचे हे खरे कारण आहे कृष्ण अंतरधाम होण्याचे हे कारण काम आला होता आणि काम हा अग्नी आहे आणि या अग्नीला जाळण्यासाठी कृष्णाने जो अग्नी प्रकट केला तो अग्नी म्हणजे विरह अग्नी तो अग्नी प्रकट करून कामदेवला गोपीकेच्या ह्दयात बंदीस्त करुन जाळले जेथे माझे वास्तव्य तु आला ना मग आता घे चटके

विरह अग्नीमध्ये कामदेव थरफडायला लागला कामदेवाला वाटले शंकराने एकदाच जाळले हा कृष्ण तर मला रोजच जाळतो मनुष्याने ही त्याचा क्रोधाचा व द्वेषाचा कामदेव असाच जाळला पाहीजे कृष्ण हे त्यागाचे प्रतीक आहे कृष्णाचे चरीत्र मनुष्याने आत्मसात केले पाहीजे गोपीकेसाठी कृष्ण एक मित्र होता गोपीकासमोर ञासदायक अनेक लिला केल्या पण गोपीकांनी त्याचा |स्विकार केला

सर्व साधनांत श्रेष्ठ साधन नामस्मरणच आहे. पण त्याचे महत्त्व कळत नाही. ते कळायला खरोखर भगवत्‌कृपाच पाहिजे. आपल्या शरीरात मुख्य जसे हृदय, आणि बाकीचे अवयव गौण आहेत, तसे परमार्थात मुख्य साधन नामस्मरण हे आहे आणि दुसरी साधने गौण आहेत. नाम हे मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे. आपले जीवन देवाच्या हाती आहे, आणि देव नामाच्या स्वाधीन आहे हे पक्के लक्षात ठेवा.

योगात, योग करीपर्यंतच समाधान असते; पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते. स्वतः निर्गुण झाल्याशिवाय निर्गुण उपासना होत नाही. तेज दिसणे, नाद ऐकणे, या सर्व गोष्टी गुणातच नाही का आल्या ? निर्गुण व्हायला देहबुद्धी सुटायला पाहिजे. सर्वव्यापी परमेश्वराला सर्वांभूतीं पाहणे ही निर्गुण उपासनाच होय. योग नामस्मरणाला पोषक तितकाच करावा; केवळ त्यालाच प्राधान्य देऊ नये. योग नामस्मरणाला पोषक आहे, पण नामस्मरण योगाच्या पलीकडे आहे; म्हणून नामस्मरणात योग येतो, योगात नामस्मरण येत नाही. सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे. नामाचे साधन हे जलद गाडीप्रमाणे आहे. रंग दिसणे, प्रकाश दिसणे, आवाज ऐकू येणे, ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल, पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते. नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग होय. नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही. नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल. जगदगुरु तुकाराम महाराज याची वाचा त्यांना अनावर झाली, ती सारखी नाम घेऊ लागली; याचा अर्थ असा की, त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले. गाडी उताराला लागली की जशी अतिवेगात येते आणि आवरत नाही, तसे हे आहे. आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणे ही भगवंताची कृपा होय.

सद्यस्थितीत सनातन धर्मावर अनेक आक्रमण होत आहे गोर गरीबांना धर्मातरा सांठी प्रलोभने देऊन त्याना भरकट वण्याचे काम चालू आहे त्यासाठी आपण एक संघ राहीले पाहीजे गाईवर प्रेम करा तीचा सांभाळ करा तीला जपा

गेल्या सात दीवसापासून चालू असलेल्या या सप्ताहची सांगता महाप्रसादाने झाली श्री संत सेवा तरूण मंडळ व ग्रामस्थानी यावेळी चोख व्यवस्था ठेवली दहा हजार भावीकांनी यावेळी प्रसाद घेतला

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात