📰 ताज्या घडामोडी

मराठवाडा वॉटर ग्रीड कार्यान्वित करा या मागणीसाठी मराठवाड्यातील भाजपा आमदारांचे विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे व माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन,आघाडी सरकारने बासनात गुंडाळलेली मराठवाडा वॉटर ग्रीड पुन्हा सुरू करून मराठवाड्यातील पाण्याची दुर्भिक्ष संपवा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर,इस्राईल येथील मेकोरेट कंपनीने, अभ्यासपूर्ण मांडणी करत केला होता प्रकल्प अहवाल( डी पी आर) सादर,निवेदनावर आ हरिभाऊ बागडे, आ बबनराव लोणीकर, आ अभिमन्यू पवार यांच्यासह मराठवाड्यातील 17 आमदारांच्या स्वाक्षऱ्या

Shamsundar chittoda
28 डिसेंबर 2022⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून संबोधली जाणारी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मराठवाड्यातील जनतेची तहान भागवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे सिंचन क्षेत्र व उद्योग धंद्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी आखण्यात आलेली मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचे काम पुन्हा सुरू करून योजना पूर्ण करून मराठवाड्याची दुष्काळ वाडा ही ओळख पुसून काढा अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह मराठवाड्यातील आमदारांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन देऊन केली

मराठवाड्यातील आमदारांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सदरील निवेदन सादर करताना मराठवाड्यातील पाणी प्रश्नाची जाणीव करून देत आघाडी सरकारने बासनात गुंडाळलेली योजना कार्यान्वित करणे कसे गरजेचे आहे ही गोष्ट उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ध्यानात आणून दिली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील तात्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये 2015 सालापासून सतत तीन वर्ष दुष्काळ पडला होता यादरम्यान मराठवाड्यामध्ये सुमारे चार हजार टँकरद्वारे पाणीपुरवठा करून मराठवाड्यातील जनतेची तहान भागवण्याचे काम करण्यात आले त्याचबरोबर लातूर शहर व जिल्ह्याला दुष्काळाच्या दहाकतेने इतके वेढले होते की त्यावेळी, लातूरला थेट रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता अगोदरच मराठवाड्याची ओळख ही दुष्काळ असणारा प्रदेश अशी असून या भागामधील सिंचनाचे क्षेत्र अतिशय कमी आहे त्याचबरोबर या ठिकाणी नागरी वस्त्यांना पिण्याचे पाणी जनावरांना पिण्याचे पाणी वैरणीचा प्रश्न तसेच शेतकऱ्यांच्या शेतीचे पाणी, उद्योग वाढीसाठी लागणारे पाणी मिळावे यासाठी इजराइलच्या तंत्रज्ञानावर आधारित मराठवाड्यासाठी वॉटर ग्रिड योजना आखण्यात आली होती यासंदर्भामध्ये तात्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून आपण स्वतः व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऑस्ट्रेलिया इजराइल श्रीलंका आदी देशांचा दौरा करून, मराठवाड्यासाठी इजराइल तंत्रज्ञानावर आधारित आदर्श व आशी वॉटर ग्रीड योजना आपल्या काळातच आपला महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून मंजूर करण्यात आली होती औरंगाबाद जालना परभणी बीड लातूर उस्मानाबाद हिंगोली नांदेड या जिल्ह्यांचा सर्वे करून या संदर्भातला प्रकल्प अहवाल (डीपीआर) इजरायल येथील तंत्रज्ञ कंपनी मेकोरेट व पाणीपुरवठा विभागाने सादर केला होता योजनेचे कामाचा शुभारंभही होणार होता मात्र राज्यातील तात्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेतून गेले आणि आघाडीचे सरकार सत्तेत आले त्यामुळे विकास विरोधी सरकार सत्तेत आल्याच्या नंतर ही योजना बासनात गुंडाळण्याचे पाप तात्कालीन आघाडी सरकारने केले मात्र आता ही योजना आपली डबल इंजिन असणाऱ्या विकास प्रिय सरकारने हाती घेऊन मराठवाड्याची दुष्काळ वाडा ही ओळख पुसून काढण्यासाठी योजना कार्यान्वित करावी असे या निवेदनात मराठवाड्यातील आमदारांनी नमूद केले आहे

उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनावर विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आमदार बबनराव लोणीकर आमदार अभिमन्यू पवार,संभाजी पाटील निलंगेकर राणा जगजितसिंह पाटील, रत्नाकर गुट्टे मेघना बोर्डीकर ज्ञानराज चौगुले संतोष दानवे नारायण कुचे भीमराव केराम संतोष बांगर लक्ष्मण पवार तानाजी मुटकुळे यांच्यासह मराठवाड्यातील आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात