📰 ताज्या घडामोडी

मराठवाड्यातील सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्नशील - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर,जालना, परभणी सह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान - लोणीकर यांची माहिती,शेतकऱ्यांसाठी आंदोलन हे काँग्रेसला उशिरा सुचलेलं शहाणपण, काँग्रेसचे शेतकऱ्यांविषयी "पुतणा मावशी"चे प्रेम शेतकरी चांगलेच ओळखून - लोणीकर

Shamsundar chittoda
17 ऑक्टोबर 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

मागील अनेक दिवसांपासून जालना व परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात प्रचंड पाऊस सुरू असून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या अतोनात नुकसान झाले आहे परतीच्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास निसर्गाने हिरावून घेतला असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी आपण केंद्र व राज्य सरकारकडे प्रयत्नशील आहोत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल अशी अपेक्षा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केली.

केंद्र व राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे ६५ मिली पेक्षा अधिक पाऊस झाला असेल तर संबंधित शेतकऱ्यांना मदत मिळणे क्रमप्राप्त ठरते त्यानुसार जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी ६५ मिली पेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे नुकसान झाले आहे या भागात अतिवृष्टी नसली तरी देखील सततच्या पावसामुळे हे नुकसान झाले आहे त्यात जालना व परभणी या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले असून मंठा तालुक्यात आतापर्यंत सरासरी ११७७ मिली (१२६%)), परतुर तालुक्यात ११६३ मिली (१२५%), घनसावंगी तालुक्यात सरासरी १३२२ मिली (११५%), जालना तालुक्यात १२५७ मिली(१३६%), बदनापूर तालुक्यात १०८६ मिली (१२४%), भोकरदन तालुक्यात १०६२ मिली (१५३%), जाफराबाद तालुक्यात ९४२ मिली (१५४%), अंबड तालुक्यात १४६६ मिली (१२७%) पाऊस झाला असल्याचे देखील लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सत्ता असताना शेतकऱ्यांसाठी एक छदामही न देणाऱ्या महाविकास आघाडी सरकार आणि त्या सरकारमधील काँग्रेस पक्ष आता मात्र शेतकऱ्यांचा कैवारी असल्याप्रमाणे टाहो फोडतो आहे शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पुतना मावशीचे प्रेम दाखवत आहे परंतु सर्वसामान्य शेतकरी बांधवांना हे वेगळे सांगण्याची गरज नाही काँग्रेस पक्षाला शेतकऱ्यांविषयी आंदोलन करण्याचे हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका देखील यावेळी लोणीकर यांनी केली प्रत्यक्ष सरकार मध्ये असताना ०१ लाख रुपये, ५० हजार रुपये, २५ हजार अशा केवळ घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी अगोदर आपण सत्तेत असताना कोणत्या आश्वासनांची पूर्तता केली ते तपासून पहावे व नंतर शेतकऱ्यांचा प्रश्न हाती घ्यावा असेही लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात काँग्रेसला सुनावले.

विद्यमान शिंदे-फडणवीस हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार असून सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असून जालना परभणी सह मराठवाड्यातील ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे देखील लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात