आज परतूर शहरातील वडारवाडी परिसरात भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच अधिकृत विजेचे कनेक्शन मोहन अग्रवाल यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाले. गेल्या कित्येक वर्षापासून या भागामध्ये जवळपास एक किलोमीटर लांबून लोकांनी बारीक वायर द्वारे विजेचे आकडे टाकून लाईन घेतली होती.
परंतु सत्ताधारी न
गराध्यक्ष व नगरसेवकांनी जाणूनबुजुन या भागाकडे दुर्लक्ष करून नागरी सुविधा पुरविण्यात असमर्थ्यता दाखवली. ही बाब तेथील नागरिकांनी दीपक हिवाळे यांचे माध्यमातून मोहन अग्रवाल यांच्याकडे मांडली असता त्यांनी सदरील प्रश्नावर तात्काळ महावितरण कार्यालय परतुर जालना व औरंगाबाद या ठिकाणी महावितरण कार्यालयातील अभियंत्याशी चर्चा करून व गेल्या वर्षभरात पाठपुरावा करून ३९ विजेचे खांब व शंभर चा ट्रांसफार्मर मंजूर करून त्या भागातील लोकांना विद्युत पुरवठा करून न्याय देण्याचे काम केले. त्यामुळे तेथील नागरिकांनी आज मोहन अग्रवाल यांना बोलावुन वडारवाडी व नागसेन नगरातील नागरीकांनी सत्कार केला. यावेळी अमोल सुरूंग ,दत्ता अंभोरे ,दीपक हिवाळे यांची उपस्थिती होती. या भागातील जवळपास ४०० ते ५०० महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
