📰 ताज्या घडामोडी

कमी पावसामुळे पिकांचे नुकसान, जायकवाडी धरणाचे चे पाणी डाव्या कालव्यात सोडा - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी,डाव्या कालव्यात पाणी सुटल्यास परतूर, घनसावंगी व अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार लाभ - लोणीकर यांची माहिती,अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) यांच्याकडे पत्राद्वारे लोणीकर यांनी केली मागणी

Shamsundar chittoda
25 ऑगस्ट 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतुर अंबड व घनसावंगी या तालुक्यामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पिकांचे पाण्यावाचून अतोनात नुकसान होत असून पीके करपुन जात आहेत. त्यामुळे जायकवाडी च्या डाव्या कालव्यात तात्काळ पाणी सोडण्यात यावे अशी मागणी माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) यांच्याकडे केली आहे.

त्यामुळे जालना जिल्ह्यातील परतूर, अंबड व घनसावंगी या तालुक्यातील शेतीचा विचार करता जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात पाणी सोडणे आवश्यक आहे. पाणी सुटल्यास परतूर घनसावंगी व अंबड या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे अशी माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली

परतुर घनसावंगी व अंबड या भागामध्ये अत्यल्प वृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन कापूस तूर मूग उडीद तत्सम पिके सुकू लागलेली आहेत या बाबीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून घरातील दागदागिने विकून, बँकातील कर्ज काढून यावर्षी पेरणी केली आहे असेही लोणीकर यांनी पत्रात नमूद केले आहे

या हंगामाच्या सुरुवातीला सर्वत्र पाऊस होत होता मात्र या भागांमध्ये पावसाच्या तुरळीक सरी कोसळल्यामुळे जोमातील पिके कोमोजू लागली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे पिके जतन करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असून डाव्या कालव्यात पाणी सोडल्यास निश्चितपणाने या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील धन जोपासण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे जायकवाडी प्रकल्पाचे पाणी डाव्या कालव्यात सोडण्यात यावे करिता माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे..!!

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात