📰 ताज्या घडामोडी

जनतेतून सरपंच निवडीच्या निर्णयाचे सरपंच परिषदेकडून स्वागत योग्य निर्णय..... घोडेबाजाराला चाप- शत्रुघ्न कणसे पाटील

Shamsundar chittoda
14 जुलै 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

ग्रामपंचायतींवर सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय शिवसेना - भाजप युती सरकारने 3 जुलै 2017 रोजी घेतला होता . मात्र महाविकास आघाडी सरकारने जानेवारी 2020 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय रद्द करीत पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून सरपंच निवड करावी असा निर्णय 25 फेब्रुवारी 2020 महाविकास आघाडी सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर करून , सरपंचाची निवड सदस्यांमार्फत करण्याचा निर्णय घेतला होता

परत नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारने दिनांक 14 जुलै रोजी निर्णय घेतला की यापुढे नगराध्यक्ष व सरपंच निवड ही थेट जनतेतूनच होणार असल्याने या निर्णयाचे स्वागत सरपंच परिषद पुणे महाराष्ट्रच्या वतीने करण्यात येत आहे.

सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न कणसे पाटील यांनी स्वागत करतांना सांगितले की माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व मा.जि.परिषद उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या माध्यमातून नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारकडे सरपंच परिषद पुणे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र राजे भोसले व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली वायाळ यांनी थेट जनतेतून नगराध्यक्ष व सरपंच निवड व्हावी म्हणून मागणी केली होती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय पुन्हा लागू केल्याने येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील जनतेच्या मनातील उमेदवाराची निवड होणार असून या निर्णयामुळे गावा गावात होणारा घोडेबाजाराला ही चाप बसणार असून यासोबतच राज्यातील अनेक गावांत वादविवाद होऊन याचे परिमाण अनेकांना भोगावे लागत असल्याने हा निर्णय अपेक्षित असतांना हा निर्णय घेण्यात आल्याने गाव गाड्यात समाजसेवा करणाऱ्या योग्य उमेदवाराला न्याय मिळण्याची अशा उंचावली असल्याचे ही यावेळी श्री कणसे यांनी सांगितले

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात