पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुमित भंडारी व संतोष काळे,सय्यद तय्यब यांच्याकडून उपवास धारकांना इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
मोंढा भागातील तय्यब मोबाईल शॉपच्या आवारात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी शहरातील उपवास धारक, व्यापारी वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती
यावेळी सुमित भंडारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की देशामध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी हिंदू-मुस्लिम समाजाने एकोपा जपला पाहिजे आणि सर्वधर्मीय सण उत्सव मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन साजरे केले पाहिजे
यावेळी माजी नगरसेवक आबासाहेब कदम,शिवसेना शहराध्यक्ष दत्ता सुरुंग,राहुल कदम,सचिन खैरे,अंकुश काष्टे,पांडुरंग सोळंके,अविनाश कुलकर्णी, मदन सोळंके,हबीब शेख,जुबेर खतीब,राजेश गोरे,राहुल काळे,शत्रूधन सोळंके,सुरेश नवगिरे,नसीर शेख,शेख अकबर,शेख अथर,सचिन धुमाळ,भारत धुमाळ,यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
