📰 ताज्या घडामोडी

परतूर येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जागतिक वन दिन उत्साहात साजरा.,वने जगली तरच जीव सृष्टी जगेल ! ------ डाॅ. भगवान दिरंगे

Shamsundar chittoda
23 मार्च 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

भारतीय संस्कृती ही अरण्य संस्कृती आहे. प्राचीन काळापासून भारतीय समाजात वनांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.परंतु अलिकडच्या काळात वृक्षतोड प्रचंड प्रमाणात होत असल्यामुळे मानवासह संपूर्ण जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ.भगवान दिरंगे यांनी केले.

ते परतूर येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जागतिक वन दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आर.आर.तायडे हे होते. व्यासपीठावर वन परिक्षेत्र अधिकारी मनिषा मगरदे, वनपाल डी.जी.राठोड,अर्चना चंद्रमोरे,सूर्यकांत बुरांडे आदी मंडळी उपस्थित होती.

आपले मनोगत व्यक्त करताना डाॅ.दिरंगे पुढे म्हणाले की, मानवाला जगण्यासाठी शुद्ध हवा, पाणी आणि अन्न वनांमुळे मिळते. सध्या जग जागतिक तपमान वाढीच्या संकटात सापडले आहे. त्यामुळे भीषण अशी पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. पिण्यासाठी, शेतीसाठी , आणि उद्योग धंद्यासाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कधी अवर्षन तर कधी अतीवृष्टी असे असंतुलन पर्यावरणात निर्माण झाले आहे.केवळ वृक्षतोड आणि प्रदूषणाचा हा दुष्परिणाम आहे.यावर वनसंवर्धन व वनरक्षण हाच एकमेव पर्याय आहे. एक झाड दररोज 230 लिटर ऑक्सीजन देते. माणसाला जगण्यासाठी 550 लिटर ऑक्सीजनची गरज आहे. तेव्हा प्रत्येक माणसाने किमान तीन झाडे लावणे आणि जगविणे आवश्यक आहे.अशीही माहिती त्यांनी शेवटी आपल्या भाषणात दिली.

वन परिक्षेत्र अधिकारी मनिषा मगरदे यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की , सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचे कार्य प्राधान्याने केले जाते. समाजातील व्यक्ती व संस्थांना वृक्ष लागवडीसाठी वनीकरण विभाग संपूर्ण सहकार्य करतो. रोप देण्यापासून , वृक्ष जोपासण्यासाठी सहकार्य केल्या जाते. वनरक्षण आणि वन संवर्धनाचे कार्य हे लोक चळवळीत रूपांतरीत व्हायला पाहिजे. मनुष्यजातीसह इतर जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी हे आवश्यक आहे.

या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य आर.आर.तायडे यांनीही आपले विचार मांडले. या प्रसंगी हरिभाऊ मोगल,अमित जवळेकर, वर्षा पवार,आर्यन अंभुरे,बाबासाहेब बिडवे,अशोक कानडे,शाम बरकुले,विलास काकडे,भिकाजी चिंचाणे,रामेश्वर गायकवाड,सुरेश शिंदे,विष्णू चव्हाण, राजेश शिंदे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकटीकरण दिगंबर लिपणे यांनी केले.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात