📰 ताज्या घडामोडी

ओबीसी समाजाला मिळणारी जिल्हा परिषद अध्यक्ष महापौर सभापती यासारखी महत्वपूर्ण पदे महा वकास आघाडी सरकारने कायमची घालवली- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची सरकारवर घणाघाती टीका,महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचा घात केला माजी मंत्री आमदार लोणीकर यांची टीका

Shamsundar chittoda
3 मार्च 2022⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

विद्यमान महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण हेतुपुरस्सर घालवले असून ओबीसी समाजाला या आरक्षणाच्या माध्यमातून मिळणारी जिल्हा परिषद अध्यक्ष महापौर सभापती यासारखी महत्वपूर्ण पदे यापुढे मिळणार नाहीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आले असून महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाला मिळणारी ही महत्त्वपूर्ण पदे कायमस्वरूपी घालवली असल्याची घणाघाती टीका माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी विकास आघाडी सरकारवर केली

महाविकास आघाडी सरकारकडून ओबीसी समाजाची वारंवार दिशाभूल केली जात होती ही बाब अनेकदा उघड देखील झाले परंतु ओबीसी आरक्षणाबाबत महा विकास आघाडी सरकार ओबीसींची फसवणूक करत आहे असे माझ्यासह भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी वारंवार स्पष्ट केले होते परंतु आज माननीय सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान इम्पेरिकल डेटा न देता गोखले इन्स्टिट्यूट चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात रेटून नेला परिणामी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी देखील दिलेल्या सूचनेप्रमाणे माहिती राज्य सरकारने पुरवली नाही म्हणून राजकारणात असणारे ओबीसी समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने या वेळी स्थगित केले ही बाब संपूर्ण ओबीसी समाजाचा घात करणारी आहे अशी घणाघाती टीका माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केली

ओबीसी समाजाला गृहीत धरून केवळ आपल्या मतासाठी वापर करण्याचा सरकारचा डाव समाजाने ओळखला असून यापुढे स्वतःला ओबीसी समाजाचे कर्तेधर्ते म्हणवून घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना समाज दारात उभा करणार नाही. केवळ महाविकास आघाडी सरकारमधील

ओबीसी समाजाला बेईमान झालेले नेते कारणीभूत असून ओबीसी समाज महाविकास आघाडीच्या हक्काच्या नेत्यांना कदापि माफ करणार नाही अशी घणाघाती टीका माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर केली

ओबीसींच्या २७% आरक्षणाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली असून राज्यातील महा वकास आघाडी सरकारने काढलेला ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे, इम्पेरीकल डेटा च्या माध्यमातून आरक्षणावर विचार शक्य असून त्या व्यतिरिक्त इतर कोणताही पर्याय नाही असे सुप्रीम कोर्टाने वारंवार सूचित केलेले असताना देखील राज्य सरकारने इंपेरिकल डेटा ऐवजी गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल दिला आणि शेवटी तो अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला न्यायमूर्ती खानविलकर व न्यायमूर्ती रवीकुमार यांच्या न्यायालयाने आज ओबीसी आरक्षण गृहीत न धरता निवडणुका घ्या अशा शब्दात आपला निकाल घोषित केला असेही लोणीकर यावेळी म्हणाले

महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने अध्यादेश आणला ते चुकीचे असून त्याबाबत सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत आरक्षण देणे आवश्यक असल्यास मागासलेपण सिद्ध करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाची स्थापना करणे, आयोगाने शिफारस करणे, आरक्षणाची मर्यादा न ओलांडणे

या त्रिसूत्री प्रमाणे काम करण्याची सूचना सुप्रीम कोर्टाने वारंवार केली होती परंतु त्या सूचनेकडे महा विकास आघाडी सरकारने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले असून महा विकास आघाडी सरकार पूर्णपणे ओबीसींच्या आरक्षणाचा विरोधी भूमिकेचे आहे असे मत लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केले

ओबीसी ऐवजी आता सर्वसाधारण प्रवर्ग म्हणून सार्वजनिक निवडणुका घ्या अशी सुप्रीम कोर्टाने सूचना केली असून त्यानुसार केवळ राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या बाबींचे पालन न केल्यामुळे महा विकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाज आपल्या हक्काचे आरक्षण गमावून बसला आहे नगरपालिका महानगरपालिका पंचायत समित्या जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्वसाधारण प्रवर्गातून घ्याव्या लागणार आहेत ओबीसी समाजाची ही हानी कधीही भरून न निघणारी आहे समाजामध्ये महा विकास आघाडी सरकार विरोधी प्रचंड असंतोष असून आगामी निवडणुकांच्या माध्यमातून हा रोष नक्की व्यक्त होईल येत्या आठवडाभरात अधिसूचना काढण्याचे सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश दिले आहे असेही लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात