📰 ताज्या घडामोडी

मराठवाडा वॉटर ग्रीड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुनरुज्जीवित करण्याचा फेरविचार करा - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे राज्यपालांना भगतसिंह कोश्यारी पत्र,मराठवाड्यातील आमदारांच्या शिष्टमंडळासह घेणार राज्यपालांची भेट,मराठवाडा वॉटर ग्रीड पुनरुज्जीवन प्रश्नी राज्यपालांनी व्यक्तिशः लक्ष घालावे- लोणीकर यांची राज्यपालांना विनंती

Shamsundar chittoda
19 मार्च 2022⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

मराठवाड्याला स्वच्छ पाणी मिळू नये, येथील आत्महत्या थांबू नये, मराठवाड्याचा विकास होऊ नये, दुष्काळवाडा म्हणून मराठवाड्याची ओळख पुसली जाऊ नये असेच विद्यमान महाविकास आघाडी सरकारला वाटते काय? शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आपण सरकारला योग्य त्या सूचना कराव्यात. अशी विनंती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्यपाल भगतसिंह जी कोश्यारी यांना पत्राद्वारे केली आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा हा सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेला विभाग आहे कोरडवाहू जमीन परवडत नाही म्हणून पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत अजूनही आत्महत्त्यांचे हे सत्र थांबलेले नाही दुष्काळाचा हा मराठवाड्याला लागलेला कलंक पुसून काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात इजराइल च्या राष्ट्रीय जल व्यवस्थापन समितीने मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प अहवाल तयार केला होता परंतु दुर्दैवाने सरकार बदलले आणि मराठवाडा वॉटर ग्रीड हा शेतकर्‍यांच्या हितासाठी उभारण्यात येणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प धूळखात पडला आहे. असेही लोणीकर यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे

देशाचे महामहीम पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी संभाजीनगर, नांदेड, परतूर आणि परळी या ठिकाणी लाखो लोकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेत मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे कौतुक केले होते व यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासनही दिले होते परंतु विद्यमान महाविकास आघाडी सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड साठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद केलेली नाही मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही ग्रीड अत्यंत महत्त्वपूर्ण असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे भाग्य बदलणारा प्रकल्प आहे. तो पूर्ण व्हावा यासाठी राज्यपाल यांनी व्यक्तिशः लक्ष द्यावे अशी विनंती मराठवाड्याच्या वतीने लोणीकर यांनी केली आहे

'दुष्काळवाडा' म्हणून मराठवाड्याला असणारा कलंक पुसणारी उद्योगाला शेतीला आणि सर्वसामान्य लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे या उदात्त हेतूने ही ग्रीड सुरू करण्यात आली होती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव या ५ जिल्ह्यांचा प्रकल्प अहवाल तयार होऊन निविदा देखील प्रसिद्ध झाल्या होत्या परभणी, हिंगोली व नांदेड या तीन जिल्ह्यांचा प्रकल्प अहवाल तयार होता महाराष्ट्राचे तत्कालीन पाणीपुरवठा खाते व इस्रायलचे पाणी पुरवठा खाते यांच्या संयुक्त माध्यमातून मेकोरेट या जगविख्यात कंपनीने अहवाल बनवण्यात आला होता. असेही लोणीकर यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

मराठवाड्यातील आमदारांच्या शिष्टमंडळासह आपण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जी यांची भेट घेणार असून मराठवाडा वॉटर ग्रीड चे पुनरुज्जीवन व्हावे व मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा मराठवाड्यात शेतीला उद्योगाला व पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे हा आम्हा सर्व लोकप्रतिनिधींचा प्रयत्न असून त्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड पुनरुज्जीवित होणे अत्यंत आवश्यक आहे"*

*- बबनराव लोणीकर*

(माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा आमदार परतुर विधानसभा)

==========================

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात