📰 ताज्या घडामोडी

कितीही अडचणी आल्यातर शेतकरी हितासाठी कारखाना सुरु होणे गरजेचे - फुलारी

Shamsundar chittoda
24 नोव्हेंबर 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

जालना (प्रतीनीधी)सहकारी साखर कारखाना हा शेतकरी हितासाठी सुरु होणे गरजेचे असुन कोणत्याही उद्योगाची चाके फिरली म्हणजे परिसरातील शेतकर्‍यांची आर्थीक उन्नती, त्या भागाची प्रगती होत असते हे सर्वज्ञात आहे. जालना साखर कारखान्यावरुन सध्या भाजपा सेनेला अडचणीत आणन्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसुन येते. यात भाजपाचा थेट फायदा नसला तरी खा. रावसाहेब दानवे यांचे भविष्यातील प्रतिस्पर्धी संपवणे किंवा त्यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावुन विरोधक कमकुवत करणे हा हेतु आहे. अशातच माजी खा. किरीट सोमय्या यांची आणि माझी राज्यातील एका विद्यमान मंत्री आणि अधिकारी यांच्या विरोधातील तक्रारी संदर्भात चर्चा झाली, तसेच औरंगाबाद येथील एक तक्रारदार आणि सोमय्या यांची भेट देखील त्याच वेळी झाली तेव्हा त्यांच्या हातातील काहि दस्तवेज आपल्या हातात होते आणि हे छाचाचित्र व्हायरल झाले यातुनच रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या भागधारकांची त्यांच्या कोडावळ्यातील काहींनी गैरसमजुत करुन दिली. यात त्यांचा आपल्या कोंडावळ्यातील कोणावर किती विश्‍वास आहे हा त्यांचा प्रश्‍न असुन आम आदमी पार्टी जेव्हा एखादी तक्रार करते तेव्हा ती सर्वाना जाहिर करुन किंवा उघड पद्धतीने करते. वास्तवात रामनगर सहकारी साखर कारखाना विषयी आम आदमी पार्टीने विधानसभा निवडणुकित उमेदवारी अर्ज दाखल करत असतानाच तत्कालीन निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे आक्षेप नोंदवला होता हे त्या संचालकांना माहिती आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा हा विषय चघळण्याचे काम आम्ही करत नाही. तसेच या प्रकरणी जर ते संचालक निर्दोष असतील तर त्यांनी आपले कागदपत्रांच्या प्रती आमच्याकडे द्याव्यात त्यांत तथ्य असेल तर आपण किरीट सोमय्या यांच्या पर्यन्त किंवा इतर नेत्यांना हे समजावुन सांगु. यामागचा हेतु एवढाच आहे कि तो कारखाना सुरु व्हावा आणि शेतकरी, कामगार, त्यांचे पाल्य यांना आधार व्हावा.

कैलास फुलारी आम आदमी पार्टी जालना

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात