📰 ताज्या घडामोडी

जलयुक्त शिवारला राज्यसरकार क्लीनचिट म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारचं काम सर्वोत्तम यावर महा विकास आघाडीचे शिक्कामोर्तब- माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर,जलयुक्त शिवार वरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर चिखलफेक करणाऱ्यांना चपराक-लोणीकर

Shamsundar chittoda
27 ऑक्टोबर 2021⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

देगलूर(प्रतीनीधी)

तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे जलयुक्त शिवार सारखे महत्त्वाकांक्षी योजना पूर्णत्वास गेले असून शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण न करता देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जाऊ शकते व त्याचा उपयोग शेतीसाठी खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो जलयुक्त शिवार योजनेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होता अत्यंत प्रामाणिकपणे केवळ शेतकऱ्यांसाठी काम करण्यात आले होते जलयुक्त शिवार योजनेला मिळालेला क्लीनचिट मुळे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या सरकारचं काम सर्वोत्तम होतं यावर विद्यमान महा विकास आघाडी सरकारने शिक्कामोर्तब केला आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवारला आज जलसंधारण विभागाकडून क्लीनचिट मिळालेली आहे. या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या योजनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत महा विकास आघाडी सरकारने आग्रह धरला होता त्या आग्रहाखातर जलयुक्त शिवार योजनेची तपासणी करण्यात आली या योजनेमुळे पाणी पातळी कमी झाली शेतकऱ्यांचं नुकसान झालं असा आरोप महा विकास आघाडी सरकारमधील मंत्री आमदार व नेत्यांनी केला होता आजतागायत या प्रोजेक्ट वरून वाटेल तशी चिखलफेक माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात आली होती त्या सगळ्यांना या अहवालामुळे चपराक बसली आहे असेही लोणीकर यावेळी म्हणाले

जलयुक्त शिवार योजनेमळे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामाच्या पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली असून काम झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी नगदी पीक घेतलं व त्यांचं उत्पादनही वाढलं आहे, या अभियानाअंतर्गत साठवणूक झालेल्या पाण्याचा शेतकऱ्यांनी वापर केला. त्यामुळे कामाची गुणवत्ता राखली गेल्याचाही निष्कर्ष समोर आला आहे. जलयुक्त शिवार याचा आणखी एक फायदा असा की, या ठिकाणी भरपूर साठवण क्षमता निर्माण झाली, त्यामुळे अभियान राबवलेल्या गावांमध्ये पाऊस उशिरा पडला तरीही टँकर लावण्याची गरज भासली नाही म्हणून जलयुक्त शिवार योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची आणि अत्यंत महतपूर्ण होती परंतु दुर्दैवाने केवळ फडणवीस द्वेषाने पछाडलेल्या सरकारने ही अत्यंत उपयुक्त असणारी योजना बंद केली असेही लोणीकर म्हणाले

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जिओ टॅगिंगसह फोटो अपलोड केल्या मुळे कामाची गुणवत्ता राखली गेली व कामात पूर्ण पारदर्शकताही आली अनेक गावांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठवले गेले ज्या गावात मागील दहा ते पंधरा वर्षापासून टँकर लागत होते त्या गावात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली जमिनीतील पाणीपातळी वाढली परिणामी विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले अनेक कोरडवाहू प्रकारच्या जमिनी हंगामी बागायती तर हंगामी स्वरूपाच्या जमिनी बागायती पिकांनी बहरून गेल्या परंतु स्थगिती सरकारने चांगले काय वाईट काय याचा विचार न करता केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून देवेंद्र फडणीस यांच्या कार्यकाळातील सर्व योजनांना बंद करण्याचं महापाप महा विकास आघाडी सरकारने केलं आहे असा आरोप माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी केला

क्लीनचिट देताना जलसंधारण खात्याने असा निष्कर्ष मांडला आहे की, जलयुक्त शिवार अभियानामुळे पीक पेरणी क्षेत्र व शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात अतिशय स्तुत्य अशी सुधारणा झाली आहे अर्थात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात जलसंधारण खात्याने केलेले काम सर्वोत्तम असून शेतकऱ्यांच्या हिताचा आहे हे पूर्णतः स्पष्ट झालं आहे केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील द्वेषापोटी महा विकास आघाडी सरकारमधील अनेकांनी विनाकारण चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला ते सर्व लोक जलसंधारण विभागाच्या अहवालाने तोंडावर आपटले आहे असा सणसणीत टोला देखील लोणीकर यांनी यावेळी लगावला

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात