📰 ताज्या घडामोडी

हयात प्रमाणपत्रासह इतर कागदपत्रांसाठी निराधारांच्या होणाऱ्या येरझरा थांबवा - प्रा सहदेव मोरे पाटील यांची टोपे लोणीकारांसह जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

Shamsundar chittoda
11 मार्च 2021⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

(मंठा)

जालना जिल्ह्यातील आठही तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावणबाळ, विधवा, अपंग, दुर्धर आजाराने ग्रस्त इत्यादी विविध योजनांचे लाभार्थी हयात प्रमाणपत्र देण्यासाठी तहसील कार्यालयात येरझारा मारताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याकारणाने त्यांचे वयोमान लक्षात घेता व तहसील कार्यालयातील गर्दी पाहता तहसीलदारांनी स्वतंत्र यंत्रणा उभी करून आवश्यक असणारी कागदपत्रे गावपातळीवर जमा करावेत परिणामी वयोवृद्ध असणाऱ्या लोकांची वाताहत न होता गावपातळीवरच प्रशासनाचे व निराधारांचे काम सोपे होईल त्यामुळे निराधारांना हयात प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी संजय गांधी निराधार समितीचे जालना ग्रामीण अध्यक्ष प्रा सहदेव मोरे पाटील यांनी पालकमंत्री राजेश टोपे, माजी पालकमंत्री आमदार बबनराव लोणीकर व जालना जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे

मार्च एण्ड असल्यामुळे तहसील परिसरात संजय गांधी निराधार योजनेचे शेकडो लाभार्थी येरझरा मारताना दिसत आहेत. खरे पाहता मंठा, बदनापुर यासारख्या तालुका पातळीवर तहसील शहराच्या किंवा बसस्थानकापासून साधारणतः ०१ ते ०२ किलोमीटर अंतरावर आहे जालना तहसील कार्यालय देखील बसस्थानकापासून ०५ ते ०६ किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या वयोवृद्धांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत त्यामुळे आपण खालील बाबींकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित तहसीलदार यांना तात्काळ सूचना करावी अशी विनंती प्रा सहदेव मोरे पाटील यांनी पालकमंत्री राजेश टोपे, माजी पालकमंत्री बबनराव लोणीकर व जिल्हाधिकारी जालना यांना पत्राद्वारे केली आहे

पेन्शन सुरू असणाऱ्या लाभार्थ्यांच्या गाव पातळीवर तहसीलदारांनी गाव निहाय याद्या तयार कराव्यात. प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख म्हणून गावातील तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील या यंत्रणेमार्फत गावपातळीवरच हयात प्रमाणपत्र जमा करण्यात यावे. कोरोना प्रादुर्भाव का असल्याकारणाने वयोवृद्धांना लवकर लागण होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे कोरोनाचा धोका टाळता येईल तसेच अगोदरच मागील अनेक महिन्यांपासून सदरील लाभार्थ्यांचे पेन्शन त्यांना मिळालेले नाही असे असताना विनाकारण चा प्रवासाचा खर्च करत त्यांना तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते तो खर्च देखील वाचला जाऊ शकतो असेही मोरे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे

हयात प्रमाणपत्र देण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत असल्याकारणाने सदरील लाभार्थ्यांची दलालांमार्फत आर्थिक लूट होत आहे. हयात प्रमाणपत्र बरोबरच आधार कार्ड व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ची सत्यप्रत मागवली जात आहे जी अगोदरच सदरील लाभार्थ्याने तहसील कार्यालयात जमा केलेली आहे व त्याच आधारे या लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर पेन्शन जमा झालेली आहे तरीदेखील या कागदांचा तगादा लावला जात आहे. सदरील लाभार्थ्यांना १००० ते १२०० रुपये पर्यंत पेन्शन मिळते असे असताना केवळ या सर्व येरझारा मारण्याच्या कारणाने सदरील लाभार्थ्यांच्या एका महिन्याचे पेन्शन याच बाबींसाठी खर्च होत आहे या लाभार्थ्यांसाठी ही रक्कम खूप मोठी आहेत त्याद्वारे सदरील लाभार्थ्यांचा गोळ्या औषधींचा खर्च भागवला जातो ही बाब प्रशासनाने लक्षात घेणे आवश्यक आहे असेही मोरे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे

ज्या हयात प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयात स्वतः येऊन देणे बंधनकारक आहे असे सांगितले जात आहे ते हयात प्रमाणपत्र देखील प्राधिकृत अधिकाऱ्यांचे नसून स्वयंघोषित स्वरूपाचे द्यावयाचे आहे, त्यामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष बोलावण्य मागचा तहसील कार्यालयाचा अट्टाहास का आहे? हेदेखील स्पष्ट होत नाही त्यामूळे वरील सर्व बाबींचा विचार करता तात्काळ संबंधित तहसीलदारांना कडक शब्दात सूचना कराव्यात अशी विनंती देखील मोरे पाटील यांनी केली आहे

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात