📰 ताज्या घडामोडी

पीक कापणी करूनच आणेवारी काढा नजर आणेवारी कालबाह्य- माजी मंत्री आ. लोणिकर

Shamsundar chittoda
19 ऑक्टोबर 2020⏱️ ५ मिनिटे वाचन
WhatsApp

मंठा ( प्रतिनिधी ) वॉटर ग्रीड ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून योजना चालवण्याची जबाबदारी त्या त्या ग्रामपंचायत ची आहे त्यासाठी गावाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले

मराठवाड्यातील पाणी पातळी मध्ये मोठी घट झाल्यामुळे गेल्या चार-पाच वर्ष मराठवाड्याला 4000 टँकर द्वारे पाणीपुरवठा केला जात होता या पार्श्वभूमीवर आपण मंत्री असताना परतूर मंठा विधानसभा मतदारसंघासाठी फिल्टर पाणी उपलब्ध करून देण्या साठी परतूर विधान सभा मतदार संघासाठी मापेगाव व वांजोळा येथे वॉटर ग्रीड योजना मंजूर केली त्यातील मापेगावच्या योजनेचे (176 गावे) पाणी मतदारसंघातील अनेक गावापर्यंत पोहोचले असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले

मंठा येथील तहसील कार्यालयामध्ये आमदार बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली वॉटर ग्रीड योजना व वृक्ष लागवडी संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली याप्रसंगी ते बोलत होते यावेळी तहसीलदार सुमन मोरे जालना तहसीलदार श्रीकांत भुजबळ गट विकास अधिकारी धस, जालना गट विकास अधिकारी कुलकर्णी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रबदडे, मजीप्रा चे उपकार्यकारी अभियंता पाथरवाडी तालुकाध्यक्ष सतीश राव निर्वळ सभापती संदीप भैय्या गोरे पंचायत समिती सभापती बीड पवार उपसभापती राजेश मोरे जि प सदस्य पंजाबराव बोराडे संभाजीराव खंदारे जि प सदस्य शिवदास हनवते नाथराव काकडे विठ्ठलराव काळे, अविनाश राठोड विभागीय वनाधिकारी वरुडे, वनक्षेत्रपाल मगरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार लोणीकर म्हणाले की मतदारसंघात राबवण्यात आलेल्या वाटर फिल्टर पाणी 12 रुपये 30 पैशांमध्ये 1000 लिटर मिळत असल्याने ग्रामस्थांना हे पाणी अतिशय स्वस्त पडत असून सरपंच ग्रामसेवक यांनी पुढाकार घेत या योजनेचा लाभ माफक दरामध्ये होत असल्याने करून घ्यावा असे सांगितले पुढे ते म्हणाले की सदरील योजनेचे वीज बिल, केमिकल, व मेंटेनन्स साठी येणारा खर्च ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी द्वारे द्यावयाचा असून प्रति कुटुंब जास्तीत जास्त 150 रुपये महिना या प्रमाणे फिल्टर पाणी उपलब्ध होत असल्याने या स्वस्त उपलब्ध असलेल्या फिल्टर पाण्याचा लाभ गावातील जनतेला मिळवून द्यावा असे आ लोणीकर यांनी सांगितले

यापुढे योजना राबविन्याची जवाबदारी ग्राम पंचायतीची असून वाटर ग्रिड मुळे टंचाई निर्माण होणार नाही यासाठी मात्र ग्रामपंचायतींनी सतर्कता दाखवत योजनेच्या मेंटेनन्स साठी लागणारा खर्च पाणीपट्टी वसुली करून निभवावा असेही ते म्हणाले

गेल्या अनेक वर्षापासून मतदारसंघात दरवर्षी जानेवारीपासूनच टँकर लागायची मात्र ही योजना झाल्यामुळे मतदारसंघातील ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतल्यास टंचाईचा सामना करावा लागणार नाही असेही ते म्हणाले

आपण मंत्री असताना मतदार संघ व मराठवाड्यात तीव्र पाणीटंचाई होती या अनुषंगाने आपल्या भागातील तीव्र पाणीटंचाई कशी दूर करता येईल यासाठी आपण गुजरात, आंध्र प्रदेश, ऑस्ट्रेलिया, इसराईल,आणि श्रीलंका येथे जाऊन ग्रीडची पाहणी करून हा प्रयोग मराठवाडाभर करण्या अगोदर प्रतिनिधिक स्वरुपात परतूर मंठा व जालना तालुक्यामध्ये वॉटरग्रीडचा प्रयोग केला तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून या योजनेचे पाणी आज मतदार संघातील 100 गावांना पाणी मिळत असून उर्वरित गावांमध्ये लवकरच योजना पूर्णत्वास जाईल असे सांगतानाच या योजनेचा उपयोग ग्रामपंचायतींनी करावा असेही ते म्हणाले

जलयुक्त शिवार मुळे मोठा फायदा झाला

=======================

पाणी आडवा पाणी जिरवा ही क्रांतीकारी योजना त्याकाळात वसंतराव नाईक यांनी राबविण्याचा प्रयत्न केला परंतु तेव्हा फारशी जनजागृतीची साधने उपलब्ध नसल्याने योजनेचे फलित मिळाले नाही मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशाच प्रकारची जलयुक्त शिवार योजना राबवली या योजनेचा आपल्या मतदारसंघातील अनेक गावांमध्ये मोठा फायदा झाल्याचेही ते म्हणाले *हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला हरितक्रांतीचे महत्त्वाकांक्षी स्वप्न दिलं होतं परंतु राज्यकर्ते त्या विचारांवर चालले नाहीत म्हणून मराठवाड्याचं वाळवंट झालं, परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महत्त्वाकांक्षी असणारी जलयुक्त शिवार योजना राबवण्यात आली व त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना वसंतराव नाईक साहेबांचे स्वप्न पूर्णत्वास गेलं असेही लोणीकर यावेळी म्हणाले*

वनीकरणाची जबाबदारी सामाजिक वनीकरण सोबतच ग्रामपंचायतींची, मंठा तहसील येथील अटल आनंदवन प्रेरणादायी

=======================

मंठा तहसील कार्यालयातील अटल आनंदवन हे वृक्ष प्रेमींसाठी प्रेरणादायी असून अत्यंत सुंदर पद्धतीने वृक्षांची लागवड व जोपासना करण्यात आली असल्याचे तसेच प्रशंसनीय असल्याचे मत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत मंठा तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांनी झाडे लावण्या संदर्भात प्रस्ताव दिलेले असून यापुढे तांत्रिक बाबींमध्ये सामाजिक वनीकरण विभागासह बदललेल्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन वृक्षलागवडीच्या कामात सहकार्य करण्याचे आमदार लोणीकर यांनी सांगितले

सामाजिक वनीकरण विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने सामाजिक वनीकरण विभागावर कामाचा ताण वाढत असून ग्रामपंचायतींनी या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन वृक्षलागवडीच्या कामामध्ये सहभाग नोंदवावा असेही यावेळी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले

पीक कापणी करूनच आणेवारी काढा

===============

पीक कापणी करूनच आणेवारी काढण्यात यावी कारण नजर आणेवारी ही इंग्रजांची आणि कालबाह्य ठरलेली पद्धत असून या पद्धतीने आणेवारी काढणे चुकीचे आहे त्यामुळेच 90 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेले असताना जानेवारी 55 टाक्याच्या पुढे निघाली आहे अशा पद्धतीने आणेवारी काढल्यास ती चुकीची ठरेल गावातील सरपंच चेअरमन ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग करूनच जानेवारी काढण्यात यायला हवी असे मत देखील यावेळी लोणीकर यांनी व्यक्त केले

या वेळी निवास देशमुख विलास घोडके बाबाजी जाधव प्रमोद बोराडे अशोक वायाळ कैलास चव्हाण नितीन चाटे रावसाहेब राठोड प्रसाद गडदे रावसाहेब वैद्य आनंद वैद्य नारायण बागल अशोक सोनटक्के संतोष बोराडेे रमेश वायाळ गंगाराम हावळे संजय गायकवाड गजानन शिंदे सतीश सद्वर्ते विनोद राठोड लक्ष्मण पवार बेबीताई खान महादेव हजारे सरपंच ग्रामसेवक यांच्यासह कर्मचारी कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात