📰 ताज्या घडामोडी

भारतातील सर्वात स्वस्त पाणीपुरवठा करणारी योजना, 1 पैशात 1 लिटर तर 12 रुपयात 1 हजार लिटर पाणी मिळणारा देशातील एकमेव प्रकल्प-माजी मंत्री आ.लोणिकर

Shamsundar chittoda
28 ऑक्टोबर 2020⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर, मंठा व जालना तालुक्यातील 176 गावे व मंठा तालुक्यातील स्वतंत्र 95 गावांच्या दोन ग्रीड पाणी पुरवठा योजना ह्या महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाकांक्षी योजना असून तिन्ही तालुक्यातील 110 गावात शुद्ध पाणीपुरवठा आज तारखेला सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून तीन तालुक्यांना पिण्याचा शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. 1 पैशात 1 लिटर तर 12 रुपयात 1000 लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे. या दोन्ही योजनेसाठी एकूण 400 कोटी रु. खर्च केले जाणार आहेत. भारतातील सर्वात स्वस्त पाणी पुरवठा करणारी योजना असणार आहे अनेक ठिकाणी ग्रीडचे काम पूर्ण झाले असून छोट्या मोठे कामे करणे प्रलंबित आहेत. ही कामे तात्काळ पूर्ण करून पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करावी अशा सूचना माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी आज दिल्या.

औरंगाबाद येथे आयोजित मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या कार्यालयात आयोजित बैठकीत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर बोलत होते यावेळी मुख्य अभियंता लोलापोड, अधीक्षक अभियंता अजयसिंह, मनोज पांगारकर, ॲड. वीरेंद्र देशमुख, कार्यकारी अभियंता गजानन रबडे, कंत्राटदार श्री घुले, उपअभियंता पाथरवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी वांजोळा पुनर्वसन उद्भव, मुख्य पाईप लाईन, जलकुंभ, गावातील वितरण व्यवस्था, सौर ऊर्जा प्रकल्प इत्यादी बाबत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सविस्तर चर्चा करून काम तात्काळ पूर्ण करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

176 गाव व 95 गाव ग्रीड पाणीपुरवठा योजना ह्या अत्यंत महत्वाकांक्षी असणाऱ्या परतूर मंठा व जालना तालुक्यातील गावांना शुद्ध पाणीपुरवठा देणाऱ्या योजना आहेत. 95 गावांची ग्रीड पाणीपुरवठा योजना खडकपूर्णा जलाशय नावावरून तयार करण्यात आली होती परंतु बुलढाणा जिल्ह्यातील धरणग्रस्त, लगत येणाऱ्या गावांच्या ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी विरोध दर्शविल्यानंतर सदर काम खडकपूर्णा ऐवजी वांजोळा (ता.मंठा) या निम्न दुधना प्रकल्पातील जलाशय अनुभवावरून सुधारित योजनेअंतर्गत करण्यात आला. त्या नवीन 95 गाव ग्रीड पाणी पुरवठा योजनेला जून 2019 मध्ये तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मंजुरी दिली आहे ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून तात्काळ कार्यवाही पूर्ण करण्याबाबतच्या सूचना यावेळी लोणीकर यांनी उपस्थित कंत्राटदार व अधिकारी यांना दिल्या.

प्रत्येक गावास त्यांच्या लोकसंख्येनुसार दरडोई 40 लिटर प्रमाणे जलकुंभ पर्यंत शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असून जलकुंभ पासून गावातील वितरण व्यवस्थेपर्यंत वैयक्तिक नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची व देखभाल दुरुस्ती करण्याची तसेच पाणीपट्टी वसूल करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने संयुक्तपणे घेण्याची गरज आहे त्यासाठी संबंधित ग्रामपंचायत आणि त्या त्या गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे लोणीकर यांनी बैठकीदरम्यान स्पष्ट केले आहे.

मूळ योजनेत पंपिंग मशिनरी साठी लागणारी वीज बचत व्हावी यासाठी 1.12 मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आलेला असून त्यामुळे कमी प्रमाणात वीज बिल मिळणार आहे खडकपूर्णा धरण उद्भव रद्द झाल्यामुळे निम्न दुधना प्रकल्पातील वांजोळा पुनर्वसन या ठिकाणाहून 95 गाव वॉटर ग्रीड योजनेतील गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे या योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेले मुख्य जलकुंभ संतुलित जलकुंभ मुख्य पाईपलाईन गावागावातील पाण्याच्या टाक्या गावांतर्गत वितरण व्यवस्था पाणीपट्टी वसुली यासह सर्वच बाबतीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व्यक्तिशः लक्ष देण्याची गरज असून लवकरात लवकर कामकाज पूर्ण करण्याबाबत च्या सूचना लोणीकर यांनी यावेळी बैठकीदरम्यान दिल्या.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात